शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रेती घाटांची संख्या घटली

By admin | Updated: November 3, 2016 02:29 IST

रेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल

महसुलावर परिणाम : ४० रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट गडचिरोली : रेतीघाटाच्या आॅनलाईन लिलाव प्रक्रियेतून जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कोट्यवधी रूपयांचा महसूल दरवर्षी मिळत असतो. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ४० रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट झाल्याने गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची संख्या कमी झाली आहे. याचा परिणाम शासनाच्या महसुलावर होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात रेतीघाटाची संख्या जवळपास १०० पेक्षा अधिक आहे. यंदा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन २०१६-१७ वर्षासाठी १२० रेतीघाट प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र रेतीचे उत्खनन व वाहतुकीसाठी ६२ रेतीघाटाला मंजुरी प्रदान करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने पहिल्या टप्प्यात २८ व दुसऱ्या टप्प्यात १८ अशा एकूण ३३ रेतीघाटांची विक्री संबंधित कंत्राटदारांना आॅनलाईन लिलाव प्रक्रियेत करण्यात आली. या रेतीघाटापासून जवळपास ३४ कोटींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मात्र प्रस्तावित करण्यात आलेल्यांपैकी ४० रेतीघाटाला मंजुरी देण्यात न आल्याने शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल यंदा बुडणार आहे. वनकायद्याच्या जाचक अटीमुळे आधीच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मोठे व मध्यम सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. परिणामी सिंचन सुविधेचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. वनकायद्यातील जाचक अटी शिथील करण्यात याव्या, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांसह शेतकऱ्यांनी शासनकर्त्यांकडे वारंवार केली आहे. मात्र केंद्र व राज्य शासनाने वनकायद्यातील जाचक अटी शिथील केल्या नाही. वनकायद्यातील जाचक अटींचा सामना रेतीघाटाच्या बाबतही करावा लागत आहे. वन विभागाच्या जागेवर असलेल्या रेतीघाटातून रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्यास वन विभागाने मज्जाव केला आहे. सदर जागा वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने महसूल विभागाला संबंधित रेतीघाटाला परवानगी देता येत नाही. संरक्षित जंगलात जवळपास ४० रेतीघाट गेल्यामुळे या रेतीघाटाचा लिलाव जिल्हा प्रशासनाला करता आला नाही. संरक्षित जंगलात गेलेल्या रेती घाटांमध्ये कुरखेडा तालुक्यातील चार, आरमोरी तालुक्यातील सहा, सिरोंचा तालुक्यात चार व अहेरी तालुक्यातील दोन रेती घाटांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील वघाळा येथील रेतीघाटाला यंदा मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे रेती घाटापासून मिळणारा एक कोटीचा महसूल बुडला आहे. (स्थानिक प्रतिनिधी) तीन तालुक्यांत रेतीघाटच उरले नाहीत ४मुलचेरा, एटापल्ली, भामरागड या तीन तालुक्यात नदी, नाल्यांची संख्या मोठी असल्याने रेतीघाट मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र या तिन्ही तालुक्यातील रेतीघाट संरक्षित जंगलात समाविष्ट झाल्याने येथील रेती घाटांना रेती उत्खनन व वाहतुकीसाठी मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे या तीन तालुक्यातील रेतीघाट लिलाव प्रक्रियेत ठेवण्यात आले नाही. या तीन तालुक्यात एकही मान्यताप्राप्त रेतीघाट नाही. त्यामुळे सन २०१६-१७ या वर्षात तालुक्यातील रेतीघाटातून रेतीचे उत्खनन होणार नाही. या तीन तालुक्यातील नागरिकांना रेतीसाठी इतर तालुक्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.