शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

‘स्मार्ट फोन’ने घटली बोगस लाभार्थींची संख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 05:34 IST

अंगणवाड्यांमधून पोषण आहार मिळणाऱ्या ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १ जुलैपासून अचानक घटली आहे.

- मनोज ताजने गडचिरोली : अंगणवाड्यांमधून पोषण आहार मिळणाऱ्या ६ वर्षांपर्यंतच्या बालकांची संख्या १ जुलैपासून अचानक घटली आहे. त्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या हाती आलेले ‘स्मार्ट फोन’ कारणीभूत ठरले आहेत. प्रत्यक्षात लाभार्थी पूर्वी होते तेवढेच आहेत, पण बोगस लाभार्थी दाखवून आहाराचे अनुदान लाटण्याच्या प्रकाराला स्मार्ट फोनमधील विशेष फिचरमुळे ब्रेक लागला आहे.आतापर्यंत रजिस्टरवर नमूद केलेल्या सर्व लाभार्थींना आहार पुरविल्याचे दाखविले जात होते. पण आता लाभार्थी मुलगा अंगणवाडीत आला का, आणि त्याला आहार देण्यात आला का याची दैनंदिन माहिती स्मार्ट फोनवरून महिला व बालविकास विभागाला द्यावी लागत आहे. त्या माहितीची खात्री करण्यासाठी बालकाच्या पालकाला फोनही केला जात आहे. त्यामुळे अंगणवाड्यांमधील बोगस लाभार्थींना ब्रेक लागला आहे. यातून आहार पुरवठ्यातील गडबडही नियंत्रणात येत आहे.बालकांसह दुर्गम भागात गरोदर व स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींनाही पोषण आहार देण्याची केंद्र व राज्य सरकारची योजना आहे. राज्यभरात असलेल्या अंगणवाड्यांच्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेगवेगळा आहार दिला जातो. त्या आहार पुरवठ्याची जबाबदारी शासनाने नेमलेल्या वेगवेगळ्या एजन्सींकडे असली तरी त्यांची नोंद ठेवून बिल मंजूर करण्याचे काम तालुकास्तरावरील बालविकास प्रकल्प अधिकारी करतात. आतापर्यंत अनेक अंगणवाड्यांमध्ये रजिस्टरवर बोगस लाभार्थी दाखविले जात होते. त्यांच्या नावावर आहार पुरविल्याचे दाखवून जास्त पैसे लाटले जात होते. मात्र आता दैनंदिन आहार वाटपाची माहिती अ‍ॅपमधून भरणे सक्तीचे करण्यात आले आहे.>दुर्गम भागात अजूनही बोगसपणाला वावगडचिरोली जिल्ह्याच्या बहुतांश दुर्गम भागात मोबाईल व इंटरनेटचे पुरेसे कव्हरेज नाही. अशा स्थितीत अंगणवाडी सेविकांना दिलेल्या स्मार्ट फोनवरून दैनंदिन माहिती अपडेट करणे अशक्य झाले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास या जिल्ह्यात आहार पुरवठ्यातील गडबड दूर होऊ शकणार नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्हा मोबाईल नेटवर्कच्या कक्षेत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करण्याची गरज आहे.