शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: July 12, 2015 02:06 IST

जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.

गणनेतून पुढे आली आकडेवारी : जंगलाची घनता वाढल्याचा परिणामगडचिरोली : जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत वन विभागाने वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्लाँटेशन कार्यक्रम राबविल्याने असलेल्या जंगलाची घनता वाढविण्यात वन विभागाला मोठे यश आले. त्यामुळे या जंगलाकडे पाठ फिरविलेले प्राणी व पक्षी पुन्हा सुरक्षित जंगल म्हणून गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला आलेले आहेत, असे निरीक्षण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. मात्र या जंगलात पुर्वी माणसांचा वावर वाढायला लागला होता. गेल्या २- ३ वर्षात वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे असलेल्या जंगलाची घनता वाढण्यास मदत झाली. त्यानंतर या जंगलात पशु व पक्ष्यांचा वावर वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत आलापल्ली वन विभागात चितळ, सांबर, उदमांजर, जंगली माकडे, रानडुक्कर, गवा, निलगाय, उडणारी खार व मोरांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे. आलापल्ली वन परिक्षेत्रात रानकुत्रे ४, अस्वल १, कोल्हे २७, रानमांजर ५, चितळ ५०१, भेडकी ५, रानडुक्कर २९४, निलगाय ३६, मोठी मांजर, खवल्या मांजर १, मोर ७५ आढळल्याचे वन्यप्रेमीजणांचे म्हणणे आहे. वन विभागाची आकडेवारी यापेक्षा वेगळी असू शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांची संख्या जंगलामध्ये वाढलेली आहे. याबाबीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. चामोर्शी वन परिक्षेत्रात लोकसहभागातून काम करण्यात आल्याने प्राण्यांची संख्या वाढल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजर्लावार यांनी म्हटले आहे.