शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जिल्ह्यातील पक्षी, प्राण्यांची संख्या वाढली

By admin | Updated: July 12, 2015 02:06 IST

जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.

गणनेतून पुढे आली आकडेवारी : जंगलाची घनता वाढल्याचा परिणामगडचिरोली : जिल्ह्यात ८० टक्क्यावर जंगल आहे. मात्र या जंगलातील पशु व पक्ष्यांची संख्या सातत्याने कमी होत होती. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांत वन विभागाने वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून प्लाँटेशन कार्यक्रम राबविल्याने असलेल्या जंगलाची घनता वाढविण्यात वन विभागाला मोठे यश आले. त्यामुळे या जंगलाकडे पाठ फिरविलेले प्राणी व पक्षी पुन्हा सुरक्षित जंगल म्हणून गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्याला आलेले आहेत, असे निरीक्षण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, आलापल्ली, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, चामोर्शी, कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जंगल आहे. मात्र या जंगलात पुर्वी माणसांचा वावर वाढायला लागला होता. गेल्या २- ३ वर्षात वन व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून दरवर्षी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे असलेल्या जंगलाची घनता वाढण्यास मदत झाली. त्यानंतर या जंगलात पशु व पक्ष्यांचा वावर वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेत आलापल्ली वन विभागात चितळ, सांबर, उदमांजर, जंगली माकडे, रानडुक्कर, गवा, निलगाय, उडणारी खार व मोरांची संख्या वाढल्याची माहिती पुढे आली आहे. आलापल्ली वन परिक्षेत्रात रानकुत्रे ४, अस्वल १, कोल्हे २७, रानमांजर ५, चितळ ५०१, भेडकी ५, रानडुक्कर २९४, निलगाय ३६, मोठी मांजर, खवल्या मांजर १, मोर ७५ आढळल्याचे वन्यप्रेमीजणांचे म्हणणे आहे. वन विभागाची आकडेवारी यापेक्षा वेगळी असू शकते. मात्र जिल्ह्यात गेल्या काही वर्षात प्राणी व पक्ष्यांची संख्या जंगलामध्ये वाढलेली आहे. याबाबीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. चामोर्शी वन परिक्षेत्रात लोकसहभागातून काम करण्यात आल्याने प्राण्यांची संख्या वाढल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजर्लावार यांनी म्हटले आहे.