शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देवैनगंगेचे पाणी देसाईगंज शहरात : अनेक मुख्य मार्ग पुन्हा अडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी रात्री १०.३० वाजता गोसेखुर्द धरणााचे २२ दवाजे एक मीटरने व ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजता २२ दरवाजे दोन मीटरने व ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे पाणी देसाईगंज तालुक्यात १२ तासाने व गडचिरोली तालुक्यात १८ तासाने पोहोचले. या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनंगेच्या उपनद्यांना दाब आल्याने देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, आष्टी, गोंडपिपरी हे प्रमुख मार्ग बंद पडले होते. चार दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूर आला होता. आता पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. मात्र आता गोसेखुर्दच्या पाण्याने पूर आला आहे. सततच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प सुध्दा ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे दोन मीटरने तर ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १२ हजार ६८२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुन्हा सकाळी ८.१० वाजता संपूर्ण ३३ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १३ हजार ७३९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी सोडलेले पाणी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. वैनगंगेला लागून अनेक उपनद्या आहेत. वैनगंगा दुथडी भरून वाहू लागल्याने उपनद्यांचे पाणी वैनगंगेत प्रवाहीत होण्यास अडचण निर्माण होऊ लागले. परिणामी उपनद्यांना दाब येऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही ठेंगण्या पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद पडले होते. मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.देसाईगंजात शिरले पाणीवैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याचा अंदाज पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला आल्याने तहसीलदार डी.टी. सोनवाने, ठाणेदार प्रदीप लांडे यांनी या घरांमधील नागरिकांना रात्रीच जवळपासच्या समाज मंदिरात हलविण्यात आले. पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मोठा पूर आल्यानंतर या ओढ्याला नदीची दाब येते. मात्र काही नागरिकांनी ओढ्यावरच घरे बांधली आहेत. हा दोष निसर्गाचा नसून नागरिकांचा आहे.बंद असलेले मार्गपाल नदीवरील पुलामुळे आरमोरी मार्ग बंद आहे. शिवणी नाल्यावरील पाण्यामुळे गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद आहे. वैनगंगा पुलावरील पाण्यामुळे आष्टी-गोंडपिपरी, कढोली-अनखोडा हे मार्ग मंगळवारी दिवसभर बंद होते. बुधवारी सायंकाळपर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे.दोघांना वाचविलेतामिळनाडू राज्यातील सेलबान विरप्पन व मधुस्वामी सुयकला हे दोन व्यक्ती गोविंदपूर नाल्यावरील पुरात अडकली असल्याची माहिती कंट्रोल रूमला प्राप्त झाली. त्यानुसार गोविंदपूर नाल्याकडे बचाव पथक पाठविण्यात आले. या पथकाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर