शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

आता गोसेखुर्दमुळे पूरपरिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

वैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

ठळक मुद्देवैनगंगेचे पाणी देसाईगंज शहरात : अनेक मुख्य मार्ग पुन्हा अडले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रविवारी रात्री १०.३० वाजता गोसेखुर्द धरणााचे २२ दवाजे एक मीटरने व ११ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी ७.३० वाजता २२ दरवाजे दोन मीटरने व ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले. गोसेखुर्द धरणाचे पाणी देसाईगंज तालुक्यात १२ तासाने व गडचिरोली तालुक्यात १८ तासाने पोहोचले. या पाण्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी पूर परिस्थिती निर्माण झाली. वैनंगेच्या उपनद्यांना दाब आल्याने देसाईगंज, चामोर्शी, आरमोरी, आष्टी, गोंडपिपरी हे प्रमुख मार्ग बंद पडले होते. चार दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे पूर आला होता. आता पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. मात्र आता गोसेखुर्दच्या पाण्याने पूर आला आहे. सततच्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.मध्यप्रदेशातील संजय सरोवराचे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाण्याची पातळी वाढून भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्प सुध्दा ओव्हर फ्लो झाले आहे. सोमवारी सकाळी ७.३० वाजता गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे दोन मीटरने तर ११ दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १२ हजार ६८२ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुन्हा सकाळी ८.१० वाजता संपूर्ण ३३ दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले होते. त्यावेळी १३ हजार ७३९ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. सकाळी सोडलेले पाणी सायंकाळपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात पोहोचले. वैनगंगेला लागून अनेक उपनद्या आहेत. वैनगंगा दुथडी भरून वाहू लागल्याने उपनद्यांचे पाणी वैनगंगेत प्रवाहीत होण्यास अडचण निर्माण होऊ लागले. परिणामी उपनद्यांना दाब येऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही ठेंगण्या पुलावरून पाणी असल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद पडले होते. मंगळवारी सायंकाळी ५.१५ वाजता ३३ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे.देसाईगंजात शिरले पाणीवैनगंगा नदीकडे जाणारा एक ओढा देसाईगंज शहरातील हनुमान वार्डाजवळून वाहतो. मागील पाच-सहा वर्षात या ओढ्याच्या किनाऱ्यावर प्रचंड वस्ती वाढली. मंगळवारी वैनगंगेला आलेल्या पुरामुळे सदर ओढ्याला दाब निर्माण होऊन ओढ्याच्या किनाऱ्यावर बांधलेल्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. पुराचे पाणी घरांमध्ये शिरण्याचा अंदाज पोलीस व आपत्ती व्यवस्थापन विभागाला आल्याने तहसीलदार डी.टी. सोनवाने, ठाणेदार प्रदीप लांडे यांनी या घरांमधील नागरिकांना रात्रीच जवळपासच्या समाज मंदिरात हलविण्यात आले. पुरामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मोठा पूर आल्यानंतर या ओढ्याला नदीची दाब येते. मात्र काही नागरिकांनी ओढ्यावरच घरे बांधली आहेत. हा दोष निसर्गाचा नसून नागरिकांचा आहे.बंद असलेले मार्गपाल नदीवरील पुलामुळे आरमोरी मार्ग बंद आहे. शिवणी नाल्यावरील पाण्यामुळे गडचिरोली-चामोर्शी मार्ग बंद आहे. वैनगंगा पुलावरील पाण्यामुळे आष्टी-गोंडपिपरी, कढोली-अनखोडा हे मार्ग मंगळवारी दिवसभर बंद होते. बुधवारी सायंकाळपर्यंत पूर ओसरण्याची शक्यता आहे.दोघांना वाचविलेतामिळनाडू राज्यातील सेलबान विरप्पन व मधुस्वामी सुयकला हे दोन व्यक्ती गोविंदपूर नाल्यावरील पुरात अडकली असल्याची माहिती कंट्रोल रूमला प्राप्त झाली. त्यानुसार गोविंदपूर नाल्याकडे बचाव पथक पाठविण्यात आले. या पथकाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पfloodपूर