शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

आधुनिकतेच्या लाटेत नाथजोगीच्या किंदरीचे स्वर होत आहेत लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 16:03 IST

विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात.

ठळक मुद्देसमाजबांधव अजूनही उपेक्षितच अनेक पिढ्यांपासून उपेक्षाच वाट्याला

प्रदीप बोडणे

गडचिरोली : 'श्रावणबाळ सुताराच्या घरी गेला, कावड कातुन देगा मला, आई बापाला नेतो काशीला..!" अशा धार्मिक, पौराणिक कथांचा संदर्भ घेत त्यावर सुंदर गीतरचना करून किंदरीच्या सुरात सूर मिसळवणारे नाथजोगी अलिकडे दुर्मिळ झाले आहेत.

आधुनिकतेच्या लाटेत भगवान शंकर, चिलियाबाळ, श्रावणबाळ, पंढरीचा पांडुरंग यांचा सात्त्विक आणि सत्य विचार, गीतावचन आपल्या किंदरीच्या स्वरातून घरोघरी पोहोचवणाऱ्या नाथजोगींच्या किंदरीचे स्वर त्यामुळे मंदावल्याचे दिसत आहे.

विकासाच्या महामार्गापासून कोसो दूर असलेला नाथजोगी समाज आजही वस्ती पाड्यावर राहून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. या समाजातील मुले आता थोडेफार शिक्षण घेऊ लागली, पण पिढ्यानपिढ्या उपेक्षित राहिलेला समाज सरकारी दप्तरी आजही नोकरीला नाही. त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. वाट्याला आलेल्या थोड्याशा जमिनीच्या तुकड्यावर संसाराचा गाडा चालवणे, एखादा छोटा-मोठा व्यवसाय करणे आदी काम या समाजाचे लोक करतात. काहीच करण्याची ऐपत नसेल तर हातात किंदरी घेऊन चार दारात जाऊन संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था करणे अशी नाथजोगी समाजाची परिस्थिती आहे.

विदर्भातील यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यात मूळ निवासी असलेला नाथजोगी समाजाचे नागरिक वर्षातील चार महिने हातात किंदरी घेऊन पोट भरण्यासाठी धडपडत असतात. मिळेल त्या ठिकाणी आपले बिन्हऱ्हाड मांडून महाराष्ट्रभर भ्रमंती करीत असतात.

माणूस बदलल्याची खंत

- आपल्या भ्रमंतीत असलेला नामदेव माडकर हा नाथजोगी सांगतो.. आता शब्दाला जगणारे लोक राहिले नाही. पैसा-आडक्याच्या मागे धावणारे युग आहे. राजा हरिश्चंद्र गोसाव्याने स्वप्नात राज्य दान दिले आणि राजाने ते सत्यात उतरवले आणि दुसऱ्या दिवशी गोसाव्याला ते राज्य सोपवून साधूचे वस्त्र धारण करून राजा हरिश्चंद्र वनवासाता निघून गेला. राजा हरिश्चंद्राचे अवतार आपण नसलो तरी, आज काही प्रामाणिक माणसांमुळे समाजाचा गाडा सुरळीत चालू आहे.

वयाची सत्तरी उलटलेला हा गोसावी सांगतो.. पूर्वी पसाभर भिक्षा मागायला घरोघरी जावे लागत नव्हते. गोरखनाथाच्या किंदरीचे स्वर रस्त्यावर घुमू लागले की, घराची सुवासीन हातात भिक्षा घेऊन भरल्या मनाने गोसाव्याला दान देई. आज घरोघरी जाऊनही धान्य मिळणे अडचणीचे झाले आहे. इतका माणूस रिता झाला आहे. तरीपण ईश्वर स्मरणात जीवनाची सार्थकता आहे, असे नाथजोगी यांनी सांगितले.

टॅग्स :Socialसामाजिक