शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

न परवडणारी योजना लादली अंगणवाड्यांवर

By admin | Updated: December 4, 2015 01:42 IST

स्तनदा तसेच गरोदर मातांना सकस आहार देण्याची योजना बालविकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने अंगणवाड्यांमार्फत सुरू केली आहे.

सेविकांमध्ये नाराजीचा सूर : महागाईचा फटकामानापूर/देलनवाडी : स्तनदा तसेच गरोदर मातांना सकस आहार देण्याची योजना बालविकास विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने अंगणवाड्यांमार्फत सुरू केली आहे. मात्र वाढत्या महागाईत सदर योजना मुळीच परवडणारी नसल्याचा सूर अंगणवाडी कार्यकर्त्यांमध्ये आहे. सुदृढ बालकांचा जन्म व्हावा, या उद्देशाने ही योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. गरोदर व स्तनदा मातांना सोमवार ते शनिवार या कालावधीत अन्नघटकनिहाय, उष्मांक, प्रथीने, लोह, मेद याचे प्रमाण असलेला आहार देण्याबाबत यात सूचविण्यात आले आहे. चपाती, भाकरी, तांदूळ, कडधान्य, डाळ, शेंगदाना लाडू, साखर, गुळ, खाद्यतेल, आयोडिनयुक्त मीठ, अंडी, केळी, नाचणी आदी घटक असलेला आहार देण्याबाबत निर्देश आहेत. शासनाकडून प्रतिमहिना २५ रूपये यासाठी देण्यात येतात. परंतु महागाईच्या काळात २५ रूपये प्रतिमहा असलेली आर्थिक तरतूद कमी पडत आहे. त्यामुळे ही योजना राबवायची कशी, हा प्रश्न अंगणवाडी महिलांना पडला आहे. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी या योजनेत अंगणवाडीमार्फत आहार पुरवठ्याबाबत सक्ती केली आहे. महागाईच्या फटक्यामुळे २५ रूपयांत एवढे पदार्थ पुरविणे अतिशय कठीण जात आहे. अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांवर येणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अंगणवाडी सेविका अडचणीत येत आहे. (वार्ताहर)