शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
3
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
4
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
5
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
6
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
7
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
8
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
9
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
10
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
11
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
12
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
13
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
14
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
15
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
16
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
17
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
18
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
19
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया पथक झाले अलर्ट; रात्री शहरात गस्ती वाढल्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:59 IST

Gadchiroli : महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; महिलांना सुरक्षा प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे काम मागील काही दिवसात सुस्तावले होते. मात्र राज्यात अलीकडे घडत असलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील निर्भया पथके अलर्ट झाली आहेत.

दिल्ली येथे एका युवतीवर बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सारे समाजमन सुन्न झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले.

काय आहे निर्भया पथक? प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने पोलिस अधिकाऱ्याचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात एक पोलिस अधिकारी व काही महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर व मोठ्या शहरांमध्ये या पथकाचे विशेष महत्त्व आहे. गस्त घालून महिला व बालकांना संरक्षण प्रदान केले जाते.

निर्भया पथकाचे काम कोणते? ज्या ठिकाणी महिला किंवा मुलींचा वावर असतो अशा ठिकाणी निर्भया पथक गस्त घालत असते. या प्रामुख्याने शाळा-महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, एखाद्या ठिकाणी महिलांची काम करण्याची जागा यांचा समावेश आहे. या पथकामुळे महिला किंवा मुलींना सुरक्षा प्रदान होण्यास मोठी मदत होते. पोलिस विभागावर इतरही कामांचा ताण आहे. त्यामुळे निर्भया पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतर कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे गस्तीकडे दुर्लक्ष होते.

मध्यंतरी काम सुस्तावले जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या घटनेनंतर निर्भया पथकाची निर्मिती करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार पथके तयार करण्यात आली होती. मात्र या पथकाचे काम सुस्तावले होते. तालुकास्तरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तर हे पथक नाहीच्या बरोबरच होते. या पथकाकडे इतर कामांची जबाबदारी सोपवली होती

या ठिकाणी विशेष लक्ष महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे पथकाचे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महिलांचा वावर असते. त्या ठिकाणी सदर पथक गस्त घालत असते. प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, बसस्थानक यांचा समावेश आहे. मोठ्या शहरांमध्ये रात्र पाळीत कारखान्यांमध्ये काम चालते. त्या ठिकाणी सुटी होण्याच्या वेळी निर्भया पथक तैनात असते.

सातत्य राहणार काय? राज्यात महिला अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर पोलिस विभागाला निर्भया पथकाची जाणीव होते. इतर वेळेवर मात्र या पथकाचा विसर पडते. पोलिस विभाग अलर्ट राहत नसल्याने याचा गैरफायदा समाजकंठकांकडून घेतला जाते. त्यांच्याकडून अत्याचाराची घटना घडून येत असल्याचे दिसन येते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली