शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

निर्भया पथक झाले अलर्ट; रात्री शहरात गस्ती वाढल्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 13:59 IST

Gadchiroli : महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; महिलांना सुरक्षा प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे काम मागील काही दिवसात सुस्तावले होते. मात्र राज्यात अलीकडे घडत असलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील निर्भया पथके अलर्ट झाली आहेत.

दिल्ली येथे एका युवतीवर बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सारे समाजमन सुन्न झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले.

काय आहे निर्भया पथक? प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने पोलिस अधिकाऱ्याचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात एक पोलिस अधिकारी व काही महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर व मोठ्या शहरांमध्ये या पथकाचे विशेष महत्त्व आहे. गस्त घालून महिला व बालकांना संरक्षण प्रदान केले जाते.

निर्भया पथकाचे काम कोणते? ज्या ठिकाणी महिला किंवा मुलींचा वावर असतो अशा ठिकाणी निर्भया पथक गस्त घालत असते. या प्रामुख्याने शाळा-महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, एखाद्या ठिकाणी महिलांची काम करण्याची जागा यांचा समावेश आहे. या पथकामुळे महिला किंवा मुलींना सुरक्षा प्रदान होण्यास मोठी मदत होते. पोलिस विभागावर इतरही कामांचा ताण आहे. त्यामुळे निर्भया पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतर कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे गस्तीकडे दुर्लक्ष होते.

मध्यंतरी काम सुस्तावले जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या घटनेनंतर निर्भया पथकाची निर्मिती करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार पथके तयार करण्यात आली होती. मात्र या पथकाचे काम सुस्तावले होते. तालुकास्तरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तर हे पथक नाहीच्या बरोबरच होते. या पथकाकडे इतर कामांची जबाबदारी सोपवली होती

या ठिकाणी विशेष लक्ष महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे पथकाचे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महिलांचा वावर असते. त्या ठिकाणी सदर पथक गस्त घालत असते. प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, बसस्थानक यांचा समावेश आहे. मोठ्या शहरांमध्ये रात्र पाळीत कारखान्यांमध्ये काम चालते. त्या ठिकाणी सुटी होण्याच्या वेळी निर्भया पथक तैनात असते.

सातत्य राहणार काय? राज्यात महिला अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर पोलिस विभागाला निर्भया पथकाची जाणीव होते. इतर वेळेवर मात्र या पथकाचा विसर पडते. पोलिस विभाग अलर्ट राहत नसल्याने याचा गैरफायदा समाजकंठकांकडून घेतला जाते. त्यांच्याकडून अत्याचाराची घटना घडून येत असल्याचे दिसन येते. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली