शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:28 IST

यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

ठळक मुद्देकडक उन्हाचा परिणाम : उत्पादनात होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के जंगलात तेंदूपत्त्याची झाडे आहेत. येथील तेंदूपत्त्याचा दर्जाही अतिशय चांगला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता खरेदीसाठी कंत्राटदार इच्छुक असतात. मात्र यावर्षी तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत कमालीची मंदी असल्याने याचा परिणाम तेंदूपत्ता लिलावांवर पडत आहे. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे. काही ठिकाणी तर तेंदूपत्ता संकलनाचे कामही सुरू झाले आहे. मात्र काही ठिकाणच्या ग्रामसभांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे त्या गावातील तेंदूपत्ता संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंदूपत्ता संकलनावर संकटाचे सावट असले तरी तेंदूपत्त्याचा दर्जा मात्र अतिशय चांगला आहे. अगदी सुरूवातीपासून यावर्षी कडक ऊन आहे. जंगल जळाल्यामुळे आणखी उष्णता वाढून तेंदूपत्ता चांगला आला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या तेंदूपत्त्यावर डाग नाही. त्याचबरोबर पालवीला अधिकची पाने फुटली आहेत. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. उत्पादन जरी वाढले असले तरी यावर्षी तेंदूपत्त्यासाठी अत्यंत कमी भाव उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मजुरांना मात्र अधिकची मजुरी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.१२ ग्रामपंचायतींना लिलावाची प्रतीक्षाभामरागड तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी इरूकडुम्मे, बोटनफुंडी, मन्नेराजाराम, पल्ली, मडवेली या गावांचा लिलाव झाला आहे. या गावांना प्रती शेकडा ४ हजार ५५५ रूपये भाव उपलब्ध झाला आहे. मात्र इतर १२ ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे या गावातील मजूर व नागरिक चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :forestजंगल