शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:28 IST

यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

ठळक मुद्देकडक उन्हाचा परिणाम : उत्पादनात होणार वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के जंगलात तेंदूपत्त्याची झाडे आहेत. येथील तेंदूपत्त्याचा दर्जाही अतिशय चांगला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता खरेदीसाठी कंत्राटदार इच्छुक असतात. मात्र यावर्षी तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत कमालीची मंदी असल्याने याचा परिणाम तेंदूपत्ता लिलावांवर पडत आहे. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे. काही ठिकाणी तर तेंदूपत्ता संकलनाचे कामही सुरू झाले आहे. मात्र काही ठिकाणच्या ग्रामसभांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे त्या गावातील तेंदूपत्ता संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंदूपत्ता संकलनावर संकटाचे सावट असले तरी तेंदूपत्त्याचा दर्जा मात्र अतिशय चांगला आहे. अगदी सुरूवातीपासून यावर्षी कडक ऊन आहे. जंगल जळाल्यामुळे आणखी उष्णता वाढून तेंदूपत्ता चांगला आला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या तेंदूपत्त्यावर डाग नाही. त्याचबरोबर पालवीला अधिकची पाने फुटली आहेत. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. उत्पादन जरी वाढले असले तरी यावर्षी तेंदूपत्त्यासाठी अत्यंत कमी भाव उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मजुरांना मात्र अधिकची मजुरी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.१२ ग्रामपंचायतींना लिलावाची प्रतीक्षाभामरागड तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी इरूकडुम्मे, बोटनफुंडी, मन्नेराजाराम, पल्ली, मडवेली या गावांचा लिलाव झाला आहे. या गावांना प्रती शेकडा ४ हजार ५५५ रूपये भाव उपलब्ध झाला आहे. मात्र इतर १२ ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे या गावातील मजूर व नागरिक चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.

टॅग्स :forestजंगल