शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

पेट्रोल पाहिजे? मग आणा तहसीलदारांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अनावश्यक फिरण्यावर येणार प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम केले आहेत. त्यांतर्गत खासगी व्यक्तीला वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर संबंधित तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. सदर नियम ४ एप्रिलपासून लागू केला जाणार आहे.केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात. वाहनांची संख्या बघितली तर खरच संचारबंदी लागू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आली. त्यामुळे ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये सामान्य व्यक्तीला चारचाकी व दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. भाजीपाला विकणारे शेतकरी, अत्यावश्यक सेवेतील शासकीय/निमशासकीय व खासगी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल विक्रीवर मात्र कोणतेही प्रतिबंध घालण्यात आलेले नाही. मात्र संबंधित वाहनचालकाला त्याबद्दलचे कार्यालयीन ओळखपत्र पेट्रोलपंप मालकाला दाखविणे अनिवार्य राहणार आहे.पेट्रोलपंपधारकांनी ज्या वाहनांकरीता पेट्रोल किंवा डिझेलची विक्री केली आहे, त्याचा संपूर्ण तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसºया दिवशी ११ वाजता न चुकता सादर करावा लागणार आहे.दुकानांची वेळ आता दुपारी १ वाजेपर्यंतचजीवनावश्यक वस्तू, भाजी, फळे, अंडी, दुध, ब्रेड, मांस इत्यादींचे विक्री करणारे दुकाने ४ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू राहतील. या दुकानांव्यतिरिक्त औषधीची दुकाने व पेट्रोलपंप नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.संचारबंदी होणार कडककोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे व एकमेकांपासून अंतर ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही नागरिक वाहने धरून अनावश्यक फिरत होते. त्यांना पेट्रोलच मिळणार नसल्याने फिरण्यावर प्रतिबंध येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPetrolपेट्रोल