शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

पेट्रोल पाहिजे? मग आणा तहसीलदारांचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अनावश्यक फिरण्यावर येणार प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक नियम केले आहेत. त्यांतर्गत खासगी व्यक्तीला वाहनात पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर संबंधित तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. सदर नियम ४ एप्रिलपासून लागू केला जाणार आहे.केंद्र शासनाने २४ मार्चपासून लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू केली आहे. बहुतांश नागरिक संचारबंदीचे पालन करीत आहेत. मात्र काही नागरिक अनावश्यक शहरात फिरत असल्याचे दिसून येते. पोलिसांनी या वाहनचालकांवर प्रतिबंध घालण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झाला नसल्याचे दिसून येते. सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावरून फिरताना दिसतात. वाहनांची संख्या बघितली तर खरच संचारबंदी लागू आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत होता. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्याही लक्षात आली. त्यामुळे ३ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जाहीर केले आहेत. त्यामध्ये सामान्य व्यक्तीला चारचाकी व दुचाकी वाहनामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरायचे असेल तर तहसीलदारांचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. भाजीपाला विकणारे शेतकरी, अत्यावश्यक सेवेतील शासकीय/निमशासकीय व खासगी वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल विक्रीवर मात्र कोणतेही प्रतिबंध घालण्यात आलेले नाही. मात्र संबंधित वाहनचालकाला त्याबद्दलचे कार्यालयीन ओळखपत्र पेट्रोलपंप मालकाला दाखविणे अनिवार्य राहणार आहे.पेट्रोलपंपधारकांनी ज्या वाहनांकरीता पेट्रोल किंवा डिझेलची विक्री केली आहे, त्याचा संपूर्ण तपशील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुसºया दिवशी ११ वाजता न चुकता सादर करावा लागणार आहे.दुकानांची वेळ आता दुपारी १ वाजेपर्यंतचजीवनावश्यक वस्तू, भाजी, फळे, अंडी, दुध, ब्रेड, मांस इत्यादींचे विक्री करणारे दुकाने ४ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू राहतील. या दुकानांव्यतिरिक्त औषधीची दुकाने व पेट्रोलपंप नेहमीप्रमाणेच सुरू राहतील.संचारबंदी होणार कडककोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी गर्दी टाळणे व एकमेकांपासून अंतर ठेवणे हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठीच संचारबंदी लागू केली आहे. असे असतानाही काही नागरिक वाहने धरून अनावश्यक फिरत होते. त्यांना पेट्रोलच मिळणार नसल्याने फिरण्यावर प्रतिबंध येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPetrolपेट्रोल