शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

स्वच्छतेसाठी मतपरिवर्तनाची गरज

By admin | Updated: January 12, 2017 00:50 IST

माणसाच्या आरोग्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले आहे.

शांतनू गोयल यांचे प्रतिपादन : जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ४८ स्पर्धक सहभागीगडचिरोली : माणसाच्या आरोग्यासाठी वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले आहे. स्वच्छतेचे खरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लोकांच्या परिवर्तनाची गरज आहे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने बुधवारी येथील चामोर्शी मार्गावरील शासकीय विज्ञान महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून सीईओ गोयल बोलत होते. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एल. वाघमारे तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी. के. माळी होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमित माणुसमारे यांनी तर संचालन करिश्मा राखुंडे यांनी केले. तर आभार एकनाथ सेलोटे यांनी मानले. स्पर्धेला परीक्षक म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डॉ. नरेश मडावी, प्रा. डॉ. विवेक जोशी, अ‍ॅड. कविता मोहरकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल मडावी, अमित पुंडे, शैलेश ढवस, सदानंद धुडसे, योगेश फुसे, प्राशिष कोंदबत्तुलवार, रोशन चकोले, एकनाथ सेलोटे, रमाकांत कायरकर, केवळराम कायरकर, संजनी कांबळे आदींनी सहकार्य केले. या स्पर्धेत दोन्ही गटातून एकुण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत वरिष्ठ गटातून वृषभ मेश्राम याने प्रथम, नसिमा गावडे हिने द्वितीय तर नम्रता डेंगानी हिने तृतीय क्रमांक पटकाविला. कनिष्ठ गटातून करिश्मा कोडापे हिने प्रथम, खुशबू दुर्गे द्वितीय तर यतीश जाधव याने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)