शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 01:25 IST

अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे.

ठळक मुद्देसरकारच्या धोरणावर टीका : गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अखेरच्या एका पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे धानपीक नष्ट झाले. तोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला. विविध रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन घटणार आहे. ही वास्तविकता असून सुद्धा शासनाने दुष्काळग्रस्त जिल्ह्याच्या यादीत गडचिरोलीचा समावेश केला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव नाराज झाले आहेत. या मुद्याला घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी स्थानिक इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात याव, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान राकाँच्या अनेक पदाधिकाºयांनी विद्यमान सरकारच्या धोरणावर जोरदार टिका केली.या आंदोलनाचे नेतृत्व राकाँचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी केले. या आंदोलनात महिलाआघाडीच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुण्यपवार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक झरकर, तुकाराम पुरणवार, प्रकाश ठाकरे, विवेक बाबणवाडे, रोशन राऊत, अब्दुल कबिर शेख, बरखत अली सय्यद, जुगनुसिंग पटवा, धनराज डोईजड, मलय्या कालवा, रफिक मोहम्मद शेख, क्रिष्णालाल पुरामे, जगन जांभुळकर, अविनाश वरगंटीवार, बंडू कोवे, कवडू बावणे, गोपी मडावी, डॉ. देविदास मडावी, सुलोचना मडावी, नितीन खोब्रागडे, देविदास आखाडे, संजय कोचे, मनिषा खेवले, निशा रामटेके, देवाजी नरूले, नजमुद्दीन खान, बुध्दाजी सिडाम, प्रकाश मुद्दमवार, रामदास गोंडाणे, जे. एम. मुप्पीडवार, राजू नैताम आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.यात राष्ट्रवादी काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनिय परिस्थिती मांडली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेस