शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम शपथ घेतो की...; चौथ्यांदा मंत्री

By संजय तिपाले | Updated: July 2, 2023 15:57 IST

पुन्हा एकदा अहेरीच्या राजघराण्याकडे सत्तासूत्रे.

संजय तिपाले, गडचिरोली: जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार व आदिवासींचे नेते धर्मरावबाब आत्राम हे अजित पवार यांच्यासोबतच्या बंडात सहभागी आहेत. २ जुलै रोजी त्यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मी धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम ईश्वरसाक्ष शपथ घेतो की... असे शब्द त्यांनी उच्चारताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी यापूर्वी तीननवेळा राज्यमंत्रीपद भूषविले होते. आता कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेऊन त्यांनी चौथ्यांदा मंत्रिमंडळात समावेश एंट्री केली आहे.  

ग्रामपंचायत सदस्य ते राज्याचे कॅबिनेट मंत्री असा धर्मरावबाबा यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे. अहेरीच्या आत्राम राजघराण्यातून आलेल्या धर्मरावबाबांनी राजकीय, सामाजिक जीवनात कायम संघर्ष केला. १९७५ मध्ये अहेरी ग्रामपंचायातचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १९८० मध्ये पंचायत समिती सभापतीपदी विराजमान झाले. पुढे १९९० मध्ये पूर्वीच्या सिरोंचा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर १९९९, २००४ व २०१९ मध्ये ते आमदार झाले. त्यांनी यापूर्वी तीनवेळा राज्यमंत्रिपद भूषविले हाेते, आता ते नव्या राजकीय सत्तासमीकरणात भाजप- शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या सरकारमध्येही त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये त्यांनी शपथ घेतली. धर्मरावबाबांची मंंत्रिमंडळात वर्णी लागताच इकडे गडचिरोलीत जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांच्यासह समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

लोकसभेच्या तोंडावर मिळाली उभारी

धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, पण तो राष्ट्रवादीला सोडविण्यासाठी त्यांनी ताकद पणाला लावली होती, शिवाय सर्व पर्याय खुले ठेवले होते. मात्र, नव्या राजकीय घडामोडीत त्यांनी अजित पवारांच्या गटासह मंत्रिपदाची शपथ घेतली. ते लोकसभा कोणत्या पक्षाकडून लढतील, हे अनिश्चित आहे, पण त्यापूर्वी मंत्रिपदी वर्णी लागल्याने त्यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाल्याची चर्चा कार्यकर्त्यांत आहे.राजघराण्याची परंपरा कायम

आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले ते राजघराण्याच्या माध्यमातूनच. यापूर्वीच्या सरकारमध्ये धर्मरावबाबा आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम मंत्री होते. अम्ब्रीशरावांना पराभूत करुन दहा वर्षांनंतर विधानसभेत पोहोचलेल्या धर्मरावबाबांना मंत्रिपद मिळाल्याने अहेरी व राजघराण्याच्या राजसत्तेची परंपरा कायम राहिली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली