शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी जाळले वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 21:45 IST

भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली.

ठळक मुद्देवनरक्षकांना मारहाण करून साहित्यही पळविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्लीपासून ३६ किमी अंतरावरील गट्टा या भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळपोळ केली. यात दुचाकी, काही साहित्य व कागदपत्रे जळाली असून काही साहित्य, मोबाईल नक्षलवाद्यांनी पळवून नेले. यावेळी उपस्थित दोन वनरक्षकांनाही बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, गट्टा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यालयाजवळच असलेल्या त्यांच्या सरकारी निवासस्थानात गोविंद अमृत दोहतरे (४०) हे गट्टा क्षेत्राचे बीट गार्ड आणि राजू मारोती झोरे (४५) हे कुंजेमर्का क्षेत्राचे बीट गार्ड झोपले असताना रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी दारावर थाप मारली. कोण आहे असे विचारले असता, ‘मी गट्टा येथील नागरिक आहे’ असा आवाज बाहेरून आल्याने त्यांनी दार उघडले असता नक्षल्यांनी त्यांच्यावर बंदुक ताणून बाहेर काढले आणि हात बांधून व डोळ्यांवरही पट्टी बांधली. त्यांच्याकडील मोबाईल घेऊन तुम्ही झारेवाडा रोडचे सर्व्हेक्षण करता काय, तुमचे रेंजर पाटील कधी येणार, तो पोलीस स्टेशनचे सर्व्हेक्षणाचे काम करत आहे न, आदिवासींचे तिरकमान जप्त करतो काय, असे म्हणत जबर मारहाण केली. त्यानंतर निवासस्थानासमोर असलेली दुचाकी आत टाकून निवासस्थान पेट्रोल टाकून पेटवून दिले. यात निवासस्थानातील सर्व महत्त्वाचे दस्तावेज जळूक खाक झाले तसेच भिंतीही फुटून गेल्याचे वनरक्षकांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.वनरक्षकांचे हात आणि पट्टी सोडून नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षल्यांनी जुन्या स्टोअर रुमचे कुलूप तोडून संयुक्त व्यवस्थापन समितीचे साहित्य, वाळवी यांचे मंडप डेकोरेशन व कॅटरिंगचे सामान व भांडी, गॅस सिलेंडर तसेच वनविभागाचे जीपीएस, मोबाईल, पेन ड्राईव्ह, नकाशे व इतर साहित्य नेल्याची तक्रार वनरक्षकांनी केली आहे.

निशाण्यावर अधिकारी, सापडले कर्मचारीसदर प्रतिनिधीने दुपारी ३:३० च्या सुमारास घटनास्थळी भेट दिली असता दोन्ही वनरक्षक पोलीस मदत केंद्रात होते. त्यांची कोणत्याही वनअधिकारी किंवा वन कर्मचाऱ्याने भेट घेतली नाही. त्यांच्यापैकी एका वनरक्षकाशी एटापल्ली तालुक्यातील वेगवेगळ्या रेंजमध्ये कार्यरत असताना दोन वेळा अशा प्रकारच्या घटनांना सामोरे जावे लागले. त्यांनी बदलीसाठी मागणी केली होती परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. यावेळी आरएफओ पाटील हे नक्षल्यांच्या निशाण्यावर असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण कनिष्ठ कर्मचारी नक्षल्यांच्या हाती लागले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी