शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलपीडित कुटुंबाचे उपोषण

By admin | Updated: July 7, 2015 01:25 IST

पोलिसांना मदत करता-करता नक्षल दहशतीचा बळी ठरलेले दोघे जण शेवटचा उपाय म्हणून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले आहेत.

दिलेले आश्वासन सरकारने पाळले नाही : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरगडचिरोली : पोलिसांना मदत करता-करता नक्षल दहशतीचा बळी ठरलेले दोघे जण शेवटचा उपाय म्हणून सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसले आहेत.व्यंकटी अंकलू बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम अशी उपोषणकर्त्यांची नावे असून, ते सध्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे वास्तव्यास आहेत. व्यंकटी बुर्ले यांचे मूळ गाव अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा हे आहे. त्यांचे वडील अंकलू बुर्ले हे पोलीस व वनविभागासाठी खबरे म्हणून काम करीत होते. १९ फेब्रुवारी १९९५ रोजी नक्षलवाद्यांनी अंकलू बुर्ले यांना छल्लेवाडा येथे गोळ्या घालून ठार केले. त्यांच्या हत्येच्या सर्व नोंदी पोलीस विभागाने घेतल्या. पुढे त्यावेळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंकलू बुर्ले यांच्या कुटुंबीयांचे चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे पुनर्वसन केले. त्यांना एक भूखंड व लहानसे घरकुल बांधून दिले आणि अंकलू बुर्ले यांचे चिरंजीव व्यंकटी बुर्ले यांना सरकारी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले होते. तेव्हापासून व्यंकटी बुर्ले यांनी पोलीस व महसुल विभागाचे अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजविले. परंतु काहीही उपयोग झाला नाही.असेच प्रकरण पुष्पा लिंगाजी गंदम यांचे आहे. त्यांचेही मूळ गाव छल्लेवाडा हे आहे. पुष्पाचे वडील लिंगाजी गंदम हे पोलीस खबऱ्या म्हणून काम करीत होते. त्यांना नक्षल्यांनी १९ फेब्रुवारी १९९५ याच दिवशी पोलिसांना माहिती देतो म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. पुढे आणखी १३ जून १९९५ रोजीही त्यांना ठार मारण्याचे धमकीपत्र मिळाले होते. पुढे लिंगाजी गंदम यांनाही भूखंड व घरकुल देऊन त्यांचे पुनर्वसन केले. विशेष म्हणजे, लिंगाजी गंदम हे वन्यजीवांची शिकार व तस्करीबाबत वनाधिकाऱ्यांना माहिती देत होते. याबाबतचे प्रमाणपत्रही दक्षिण चंद्रपूर वनवृत्ताचे तत्कालीन वनसंरक्षक व्ही. टी. पत्की यांनी त्यांना दिले होते. विशेष म्हणजे, पुनर्वसनानंतर लिंगाजी गंदम यांचा मुलगा दिलीप गंदम हा अहेरी येथील प्राणहिता उपमुख्यालयात पोलीस गाइड म्हणून काम करु लागला. दरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याची बहीण पुष्पा गंदम हिच्याकडे आई-वडिलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. मात्र सरकारने नोकरीचे आश्वासन देऊनही काहीही न केल्याने त्यांच्यापुढे उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे. परंतु नक्षल्यांच्या भीतीमुळे ते गावी जाऊन जमिनीची मशागत करु शकत नाही. त्यामुळे छल्लेवाडा येथील जमीन सरकारजमा करुन तेवढीच जमीन आष्टी येथे उपलब्ध करुन द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)