शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; नक्षलवाद नियंत्रणात आणला, पुढील पाच वर्षात पूर्णपणे संपवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:19 IST

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त आलापल्लीत घेतली जाहीर सभाअमित शाह यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. भाजप उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी शाह यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यात ८५ टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. वैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बॅरेज बांधून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तसेच बल्लारशहा-एटापल्ली रेल्वेमार्ग उभारण्याचे आश्वासनही शाह यांनी आपल्या भाषणात दिले.जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भाजपने संविधानिक मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आदिवासी शहीद जवानांसाठी मोठे स्मारक बनविणार असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून येथेच कॅन्सरच्या उपचाराची सुविधा देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले.यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

इथेही ‘शरदराव’अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. शरदराव, तुम्ही ५० वर्षात केले नाही ते आम्ही ५ वर्षात केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचाच कारभार सरस असल्याचे सांगितले. शाह यांनी तीन वेळा पवारांचे नाव घेतले. त्यामुळे भाजपला स्पर्धक म्हणून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त महत्वाची वाटत असावी, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये उमटत होती.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहा