शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Maharashtra Election 2019; नक्षलवाद नियंत्रणात आणला, पुढील पाच वर्षात पूर्णपणे संपवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:19 IST

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त आलापल्लीत घेतली जाहीर सभाअमित शाह यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. भाजप उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी शाह यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यात ८५ टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. वैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बॅरेज बांधून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तसेच बल्लारशहा-एटापल्ली रेल्वेमार्ग उभारण्याचे आश्वासनही शाह यांनी आपल्या भाषणात दिले.जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भाजपने संविधानिक मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आदिवासी शहीद जवानांसाठी मोठे स्मारक बनविणार असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून येथेच कॅन्सरच्या उपचाराची सुविधा देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले.यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

इथेही ‘शरदराव’अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. शरदराव, तुम्ही ५० वर्षात केले नाही ते आम्ही ५ वर्षात केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचाच कारभार सरस असल्याचे सांगितले. शाह यांनी तीन वेळा पवारांचे नाव घेतले. त्यामुळे भाजपला स्पर्धक म्हणून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त महत्वाची वाटत असावी, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये उमटत होती.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहा