शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

Maharashtra Election 2019; नक्षलवाद नियंत्रणात आणला, पुढील पाच वर्षात पूर्णपणे संपवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 16:19 IST

गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली.

ठळक मुद्देनक्षलग्रस्त आलापल्लीत घेतली जाहीर सभाअमित शाह यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच वर्षात भाजप सरकारने नक्षलवाद नियंत्रणात आणला आहे, पुढील पाच वर्षात तो पूर्णपणे संपवू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे जाहीरपणे दिली. भाजप उमेदवारांसाठी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी शाह यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यात ८५ टक्के स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले. मुलचेरा तालुक्यातील चेन्ना प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे, तो प्रकल्प लवकरच सुरू होईल. वैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बॅरेज बांधून सिंचनाची व्यवस्था केली जाईल. तसेच बल्लारशहा-एटापल्ली रेल्वेमार्ग उभारण्याचे आश्वासनही शाह यांनी आपल्या भाषणात दिले.जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला भाजपने संविधानिक मान्यता दिल्याचे ते म्हणाले. आदिवासी शहीद जवानांसाठी मोठे स्मारक बनविणार असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईला जावे लागू नये म्हणून येथेच कॅन्सरच्या उपचाराची सुविधा देण्याचे आश्वासन शाह यांनी दिले.यावेळी मंचावर खासदार अशोक नेते, भाजपचे विदर्भ संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, आ.रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, अहेरीतील उमेदवार आ.अम्ब्रिशराव आत्राम, गडचिरोलीचे उमेदवार आ.डॉ.देवराव होळी, आरमोरीचे उमेदवार आ.कृष्णा गजबे, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, अहेरीच्या नगराध्यक्ष वर्षा ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या माजी प्रदेश सचिव सगुणा तलांडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा पहिल्यांदाच नक्षलग्रस्त भागात आल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त लागला होता. ही सभा निर्विघ्नपणे पार पडल्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

इथेही ‘शरदराव’अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचा उल्लेख आपल्या भाषणात आवर्जुन केला. शरदराव, तुम्ही ५० वर्षात केले नाही ते आम्ही ५ वर्षात केले, असे सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचाच कारभार सरस असल्याचे सांगितले. शाह यांनी तीन वेळा पवारांचे नाव घेतले. त्यामुळे भाजपला स्पर्धक म्हणून काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त महत्वाची वाटत असावी, अशी चर्चा श्रोत्यांमध्ये उमटत होती.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहा