शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल सप्ताहाचा पायाभूत चाचणीला फटका

By admin | Updated: July 30, 2016 01:47 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ व २९ जुलै रोजी दुसऱ्या व आठव्या वर्गासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते.

केवळ गडचिरोली जिल्ह्यापुरता निर्णय : ९ व १० आॅगस्ट रोजी आयोजन गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत २८ व २९ जुलै रोजी दुसऱ्या व आठव्या वर्गासाठी पायाभूत चाचणीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले होते. मात्र याच कालावधीत २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळा नक्षलग्रस्त भागात मोडत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शिक्षण विभागाने सदर चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी लांबनीवर ढकलली आहे. दंडकारण्य क्षेत्रात नक्षल्यांकडून दरवर्षीच २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत नक्षल्यांकडून बंदचे आवाहन केले जाते. त्याचबरोबर झाडे पाडून रस्ता बंद करणे, रस्त्याच्या बाजूला नक्षल बॅनर लावणे, पत्रके टाकणे व त्या माध्यमातून नक्षल चळवळीचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या कालावधीत हिंसक कारवायाही केल्या जातात. नक्षल्यांच्या या कृत्यांमुळे कोरची, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमधील नक्षलग्रस्त भागांमध्ये मोडणाऱ्या शाळा बंद ठेवल्या जातात. नक्षल्यांच्या दहशतीमुळे शिक्षकही शाळेमध्ये जाण्याचे धाडस करीत नाही. योगायोगाने शिक्षण विभागाने पायाभूत चाचणी २८ व २९ जुलै रोजी आयोजित केली होती. मात्र जिल्ह्यातील ही परिस्थिती लक्षात घेता, याच कालावधीत परीक्षा घेतल्यास सदर परीक्षेला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्याचबरोबर शिक्षण विभागाचा आदेश मानत नक्षल्यांचा विरोध झुगारून परीक्षेचे आयोजन केल्यास त्याचे विपरित परिणामही संबंधित शिक्षकाला भोगावे लागण्याची शक्यता होती. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्यानंतर नियोजित तारीख रद्द करून सदर चाचणी ९ व १० आॅगस्ट रोजी घेण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशामध्ये मात्र काही अपरीहार्य कारणामुळे तारखेत बदल करण्यात आला असल्याचे म्हटले आहे. मात्र नक्षल्यांच्या सप्ताहामुळेच सदर चाचणी लांबणीवर टाकली असल्याचे शिक्षक वर्गातून बोलले जात आहे. शिक्षकांच्या दृष्टीनेही हे सोयीचेच झाले आहे. (नगर प्रतिनिधी) प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्याचे निर्देश सर्वच शाळांपर्यंत पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका पोहोचल्या आहेत. सदर प्रश्नपत्रिका गोपनिय व सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे निर्देश सुध्दा शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे ९ आॅगस्टपर्यंत या प्रश्नपत्रिकांची सुरक्षा शाळांचे मुख्याध्यापक, संबंधित विभागाचे शिक्षक यांना करावी लागणार आहे. हे अत्यंत जोखमीचे काम त्यांच्यासाठी राहणार आहे.