शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नारगुंडा प्रकाशले; कियर परिसर सहा दिवसांपासून अंधारात

By admin | Updated: September 3, 2015 00:55 IST

भामरागड वीज केंद्राअंतर्गत येत असलेल्या कियर गावाचा वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित झाला आहे.

भामरागड : भामरागड वीज केंद्राअंतर्गत येत असलेल्या कियर गावाचा वीज पुरवठा मागील सहा दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात अंधारात राहावे लागत आहे. संतापलेल्या नागरिकांनी वीज कार्यालयावर बुधवारी धडक दिली. कियर गावापासून हलवेर, नारगुंडा, कोठी परिसरात दोन दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने कियरजवळ झाडे पडले. त्यामुळे वीज तारा तुटल्या व हा विद्युत पुरवठा खंडित झाला. दुसऱ्या दिवशी झाडे तोडून तार जोडणी करण्यात आली व कोठी परिसरातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. कियर गावातील ट्रॉन्सफार्मर जळाल्याने मागील सहा दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे. येथील नागरिक वीज कार्यालयात पोहोचले व त्यांनी चौकशी केली असता, नवीन ट्रॉन्सफार्मर आणण्यासाठी वाहन उपलब्ध नाही, वाहन मिळताच ट्रॉन्सफार्मर फिट करण्यात येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली. यावेळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांनी ट्रॉन्सफार्मर नेण्यासाठी वाहन आणा लाईनमन तुमच्यासोबत येऊन ट्रॉन्सफार्मर फिट करून देईल, असे सांगितले. शेवटी खासगी वाहन बोलावून ट्रॉन्सफार्मर कियर गावाकडे पाठविण्यात आले. कदाचित गुरूवारपर्यंत येथील वीज पुरवठा पूर्ववत सुरू होईल, अशी शक्यता आहे. कियर गावातून आलेल्या नागरिकांच्या शिष्टमंडळात पोची कुडयेठी, नामदेव वाचामी, रैनू पुंगाटी, सुरेश बोगामी, सुखदेव वाचामी, मंगरू तेलामी, साधू दुर्वा, संतोष पुंगाटी, विजय मडावी, कन्ना तेलामी, उमेश पुंगाटी, विनोद तेलामी, शंकर कुडयामी, रैनू पिडसे, नरेश बिश्वास, संतोष दुर्वा, योगेश बोगामी, दल्लू बोगामी आदी नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)