शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

५० हेक्टर शेतीसाठी नाला ठरतोय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत.

ठळक मुद्देसिंचनाद्वारे रोवणीची कामे सुरू : कळमगाव-एकोडीदरम्यानच्या शेतीसाठी आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : यावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीपासून पाऊस समाधानकारक येत नसल्याने अद्यापही रोवणीला वेग आला नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे करीत आहेत. चामोर्शी तालुक्याच्या कन्हाळगाव-एकोडी दरम्यान एक नाला आहे. या नाल्यालगत असलेली जवळपास ५० हेक्टर शेती मोटारपंप, डिझेल इंजिनद्वारे ओलीत करून रोवणीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळा हा नाला परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.नाल्याच्या परिसरात कन्हाळगाव व एकोडी या दोन्ही गावातील शेतजमिनी आहेत. पाण्याची कोणतीही सोय या भागात नसल्याने शेतकरी सर्वस्वी नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत. नाल्यातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी येथील गाळ उपसून साफसफाई करणे आवश्यक आहे. तेव्हाच नाल्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढून अन्य शेतकऱ्यांसाठीसुद्धा सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे येथील नाल्यातील गाळाचा उपसा करून पाणी साठवणुकीसाठी ठिकठिकाणी बंधारे बांधणे आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यातही असते पुरेशे पाणीकळमगाव-एकोडी दरम्यानच्या नाल्यात उन्हाळ्यातही पाणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाल्याचे पीक घेतात. बरेच शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप उपलब्ध केल्यास सर्वच शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येईल.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस