शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

५० हेक्टर शेतीसाठी नाला ठरतोय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत.

ठळक मुद्देसिंचनाद्वारे रोवणीची कामे सुरू : कळमगाव-एकोडीदरम्यानच्या शेतीसाठी आधार

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : यावर्षीच्या खरीप हंगामात सुरूवातीपासून पाऊस समाधानकारक येत नसल्याने अद्यापही रोवणीला वेग आला नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, असे शेतकरी रोवणीची कामे करीत आहेत. चामोर्शी तालुक्याच्या कन्हाळगाव-एकोडी दरम्यान एक नाला आहे. या नाल्यालगत असलेली जवळपास ५० हेक्टर शेती मोटारपंप, डिझेल इंजिनद्वारे ओलीत करून रोवणीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळा हा नाला परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.नाल्याच्या परिसरात कन्हाळगाव व एकोडी या दोन्ही गावातील शेतजमिनी आहेत. पाण्याची कोणतीही सोय या भागात नसल्याने शेतकरी सर्वस्वी नाल्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.विशेष म्हणजे या नाल्यात वर्षभर पाणीसाठा असतो. याचा फायदा घेत अनेक शेतकºयांनी कृषी पंप बसवून शेतात सिंचनाची सोय उपलब्ध केली आहे. नाल्यालगत जवळपास ३० विद्युत मीटर व पंप लावले आहेत. त्यानुसार शेतकरी नाल्यातील पाण्याचा वापर करून खरीपात धान पिकासह उन्हाळ्यात भाजीपाल्याची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी तर ७०० ते ८०० मीटर लांब पाईपलाईन टाकून नाल्यातील पाणी शेतापर्यंत पोहोचविले आहेत. नाल्यातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी येथील गाळ उपसून साफसफाई करणे आवश्यक आहे. तेव्हाच नाल्यातील पाणी साठवणूक क्षमता वाढून अन्य शेतकऱ्यांसाठीसुद्धा सिंचनाची सोय होऊ शकते. त्यामुळे येथील नाल्यातील गाळाचा उपसा करून पाणी साठवणुकीसाठी ठिकठिकाणी बंधारे बांधणे आवश्यक आहे. यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उन्हाळ्यातही असते पुरेशे पाणीकळमगाव-एकोडी दरम्यानच्या नाल्यात उन्हाळ्यातही पाणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी आपल्या शेतात भाजीपाल्याचे पीक घेतात. बरेच शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी पंप उपलब्ध केल्यास सर्वच शेतकऱ्यांना दुबार पीक घेता येईल.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस