शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

विवाहितेची आत्महत्या नव्हे हत्या, आई-वडिलांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 10:57 IST

पोलिसांवर आरोप : चौकशी करून खुनाचा गुन्हा नोंदवा

गडचिराेली : सासरच्या मंडळींकडून पैशासाठी व हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ हाेत असल्याचे तिच्यासाेबत फाेनवरून बाेलताना समजले. दरम्यान, लग्न झाल्यावर दाेन वर्षांत माझ्या मुलीला आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिचा मृत्यू हा संशयास्पद असून, माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही. तिची हत्याच झाली आहे, असा खळबळजनक आराेप करीत सासरकडील दाेषी मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी पीडित आई-वडिलांसह नातेवाइकांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

लीना वीरेंद्र उंदीरवाडे (रा. चामोर्शी) असे मृतक विवाहित महिलेचे नाव असून, जावई वीरेंद्र गिरीधर उंदीरवाडे तसेच गिरीधर श्रावण उंदीरवाडे, शाेभा गिरीधर उंदीरवाडे, नरेंद्र गिरीधर उंदीरवाडे व कल्याणी नरेंद्र उंदीरवाडे या सर्वांनी लीनाचा घातपात केला, असा आराेप मृतक लीनाचे वडील उद्धव विठ्ठल वालदे यांनी पत्रपरिषदेत केला.

त्यांनी सांगितले की, पालेबारसा नजीकच्या जनकापूर रिठ येथील आम्ही रहिवासी असून मुलगी लीना वालदे हिचा विवाह चामाेर्शी येथील वीरेंद्र उंदीरवाडे यांच्याशी १५ मार्च २०२१ राेजी झाला. विवाहाला दाेन वर्ष पूर्ण झाले. लीना ही आपल्या घरी चार महिने चांगल्या प्रकारे नांदत हाेती. मात्र, त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या सर्व लाेकांकडून हुंडा व पैशासाठी तिचा छळ सुरू केला.

लहान-सहान कारणावरून मारहाण व मानसिक त्रास देणे सुरू झाले. दरम्यान, लीना आमच्याशी माेबाइलवर बाेलताना तुम्ही पैसे पाठवा, माझ्या सासरचे लाेक पैसे मागत आहेत, असे सांगत हाेती. मात्र, आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही सासरकडील मंडळींनी मागितलेले पैसे देऊ शकलाे नाही. दरम्यान, २ एप्रिल २०२३ राेजी लीनाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती सकाळी ९ वाजता सासरच्या मंडळींनी फाेनद्वारे दिली, असे वडील उद्धव वालदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वडील उद्धव वालदे, आई पुष्पा वालदे, भाऊ मिलिंद वालदे व आनंदराव टेंभुर्णे उपस्थित हाेते.

विषामुळे मृत्यू तरी गुन्हा नाेंद नाही

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात विषामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मग लीनाने विष घेतले तर त्याला कारण काय, की तिला विष जबरदस्तीने दिले गेले, या दृष्टिकाेनातून चामाेर्शी पाेलिसांनी तपास केला नाही, केवळ आमचे थातूर-मातूर बयाण नाेंदवून तसेच मर्ग दाखल करून हे प्रकरण दडपले, असा आराेप उद्धव वालदे यांनी यावेळी केला.

चौकशी करून योग्य कार्यवाही करू

चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी आरोप फेटाळून लावले. न्यायवैद्यक चाचणी अहवाल आल्यावर तसेच आरोपात तथ्य आढळल्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे त्यांनी सांगितले. कोणालाही अजिबात पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली