शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नगर पालिकेने मूलभूत सुविधा पुरविण्यास प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:01 IST

नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन वस्त्यांमध्ये नाल्या, वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत.

ठळक मुद्देआरमोरीवासीयांची मागणी : स्मशानभूमी विकासावर अनेकांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील स्मशानभूमीत सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने सुमारे ५३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. स्मशानभूमीत सुविधा निर्माण करण्याऐवजी शहरात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी नगर परिषदेने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आरमोरीवासीयांकडून होत आहे.नगर परिषदेमार्फत सुमारे ५३ लाख रुपये खर्चुन स्मशानभूमीत विविध सुविधांची निर्मिती केली जात आहे. याबाबतचे वृत्त २२ जून रोजी प्रकाशित केले. त्यानंतर आरमोरी येथील नागरिकांनी नगर परिषदेच्या कारभाराबाबत टीका केली आहे. आरमोरी शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. नवीन वस्त्यांमध्ये नाल्या, वीज, पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विकास कामांची मागणी केल्यास निधी नसल्याचे कारण नगर परिषदेकडून सांगितले जाते. मात्र अनावश्यक बाबींवर खर्च केला जात असल्याचे दिसून येते.आरमोरी येथे ग्रामपंचायत असतानाच स्मशानभूमीचा विकास करण्यात आला. या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र केवळ चार वर्षातच पुन्हा दुरूस्तीच्या कामांना व वाढीव बांधकामांसाठी ५३ लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची बोंब असताना अनावश्यक बाबींसाठी निधीची उधळण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.बांधकामांचे रिंग करण्याचे प्रमाण वाढलेकोणत्याही बांधकामाची ई-निविदा काढून कमीतकमी किमतीला जो कंत्राटदार काम करण्यास तयार होईल, त्या कंत्राटदाराला काम दिले जाते. या स्पर्धेत कधीकधी २० ते २५ टक्के बिलोवर काम घेतले जाते. यामुळे कंत्राटदारांना फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनाही देणगी मिळत नाही. परिणामी कामांचे रिंग करण्याचे प्रकार आरमोरी नगर परिषदेत वाढीस लागले आहेत. यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. कंत्राटदारांनी संघटना स्थापन केली आहे. नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामांचे रिंग केली जात आहे. या प्रकारावर आळा घालण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Socialसामाजिक