शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
4
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
5
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
6
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
7
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
8
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
9
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
10
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
11
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
12
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
13
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
14
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
15
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
17
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
18
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
19
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
20
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'

देलनवाडी गावात गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 5:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु ...

ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी । क्षमता तपासणीसाठी दोन दिवसांपासून नळ योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जातो. सध्या गावात पाणीपुरवठा होत असल्याने विहिरीचे खोलीकरण करण्यासाठी जुन्या विहिरीतील पाण्याची क्षमता तपासणीकरिता दोन दिवसांपासून नळ योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे.देलनवाडी येथे पावसाळा वगळून अनेक नागरिक वर्षभर नळ योजनेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. गावातील टाकीमध्ये खोब्रागडी नदीवरील विहिरीतून पाईपद्वारे पाणी आणून साठविले जाते. त्यानंतर गावात पुरवठा केला जातो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. परंतु प्रत्येक वेळी पाणी शुद्ध होईलच, असे नाही. त्यामुळे येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जलप्राधिकरण, खासदार, आमदार व जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला. परंतु दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करेल एवढी क्षमता नाही. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शासनाच्या निधीतूनच जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय नदीकाठावरील जुन्या विहिरीतून चांगल्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. परंतु त्या विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही.या विहिरीत बोअर मारल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्याकरिता प्रयोग म्हणून जुन्या विहिरीचे पाणी आटवून या पाण्याची क्षमता तपासण्याकरिता मागील दोन दिवसांपासून देलनवाडी येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिला विहिरीवर गर्दी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून देलनवाडी गावासाठी जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण