शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबूतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
7
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
8
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
9
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
10
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
11
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
12
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
13
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
14
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
15
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
16
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
17
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
18
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
19
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
20
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."

देलनवाडी गावात गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु ...

ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी । क्षमता तपासणीसाठी दोन दिवसांपासून नळ योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जातो. सध्या गावात पाणीपुरवठा होत असल्याने विहिरीचे खोलीकरण करण्यासाठी जुन्या विहिरीतील पाण्याची क्षमता तपासणीकरिता दोन दिवसांपासून नळ योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे.देलनवाडी येथे पावसाळा वगळून अनेक नागरिक वर्षभर नळ योजनेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. गावातील टाकीमध्ये खोब्रागडी नदीवरील विहिरीतून पाईपद्वारे पाणी आणून साठविले जाते. त्यानंतर गावात पुरवठा केला जातो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. परंतु प्रत्येक वेळी पाणी शुद्ध होईलच, असे नाही. त्यामुळे येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जलप्राधिकरण, खासदार, आमदार व जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला. परंतु दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करेल एवढी क्षमता नाही. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शासनाच्या निधीतूनच जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय नदीकाठावरील जुन्या विहिरीतून चांगल्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. परंतु त्या विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही.या विहिरीत बोअर मारल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्याकरिता प्रयोग म्हणून जुन्या विहिरीचे पाणी आटवून या पाण्याची क्षमता तपासण्याकरिता मागील दोन दिवसांपासून देलनवाडी येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिला विहिरीवर गर्दी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून देलनवाडी गावासाठी जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण