शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

देलनवाडी गावात गढूळ पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु ...

ठळक मुद्देजलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी । क्षमता तपासणीसाठी दोन दिवसांपासून नळ योजना बंद

लोकमत न्यूज नेटवर्कमानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे लगतच्या खोब्रागडी नदीवरून नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु पावसाळ्याच्या दिवसात नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जातो. सध्या गावात पाणीपुरवठा होत असल्याने विहिरीचे खोलीकरण करण्यासाठी जुन्या विहिरीतील पाण्याची क्षमता तपासणीकरिता दोन दिवसांपासून नळ योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी विहिरीवर महिलांची गर्दी होत आहे.देलनवाडी येथे पावसाळा वगळून अनेक नागरिक वर्षभर नळ योजनेच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. गावातील टाकीमध्ये खोब्रागडी नदीवरील विहिरीतून पाईपद्वारे पाणी आणून साठविले जाते. त्यानंतर गावात पुरवठा केला जातो. परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नळाद्वारे गढूळ पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिक तुरटी फिरवून पाणी शुद्ध करतात. परंतु प्रत्येक वेळी पाणी शुद्ध होईलच, असे नाही. त्यामुळे येथे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने जलप्राधिकरण, खासदार, आमदार व जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला. परंतु दुर्लक्ष झाले. ग्रामपंचायत प्रशासन जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करेल एवढी क्षमता नाही. उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने शासनाच्या निधीतूनच जलशुद्धीकरण यंत्र खरेदी करावे लागणार आहे. याशिवाय नदीकाठावरील जुन्या विहिरीतून चांगल्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. परंतु त्या विहिरीत पुरेसे पाणी उपलब्ध नाही.या विहिरीत बोअर मारल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. त्याकरिता प्रयोग म्हणून जुन्या विहिरीचे पाणी आटवून या पाण्याची क्षमता तपासण्याकरिता मागील दोन दिवसांपासून देलनवाडी येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाणी भरण्यासाठी महिला विहिरीवर गर्दी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून देलनवाडी गावासाठी जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषण