शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

देशाची सर्वदृष्ट्या सक्षमतेकडे वाटचाल

By admin | Updated: August 26, 2016 01:08 IST

पूर्वीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमही नव्हता.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : तिरंगा रॅलीचा समारोपगडचिरोली : पूर्वीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांकडे विकासात्मक दृष्टी नव्हती. तसेच नियोजनबद्ध कार्यक्रमही नव्हता. त्यामुळे मागील काळात देशाची आर्थिक पिछेहाट झाली. मात्र विकासदृष्टी असलेल्या नरेंद्र मोदी यांनी भारताची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना कार्यान्वित केल्या. विद्यमान केंद्र सरकारच्या दोन वर्षांच्या काळात देशातील खाणीतून भारताला ३ लाख ३० हजार कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मेक इन इंडिया, स्किल इन इंडियाच्या माध्यमातून भारताची संपन्नतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. तसेच केंद्र शासनाकडून आतंकवाद व नक्षलवाद संपविण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहे, त्यामुळे देश सुरक्षितता व संपन्नतेकडे वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनापासून तिरंगा रॅली हा कार्यक्रम सुरू आहे. त्याचा समारोप गुरूवारी नामदार अहीर यांच्या उपस्थित गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात झाला. यावेळी ते जाहीर सभेत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. या कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, चंद्रपूर जि. प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रकाश पोरेड्डीवार, नाना नाकाडे, किसन नागदेवे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, प्रकाश गेडाम, चंद्रपूरच्या जि. प. सदस्य ताराबाई कोटगले, स्वप्नील वरघंटे, प्रकाश अर्जुनवार, अनिल फुलझेले, मोतीलाल कुकरेजा, देसाईगंजचे नगराध्यक्ष श्याम उईके, विलास भांडेकर, शशिकांत साळवे, अनिल पोहणकर, रामेश्वर सेलुकर, डॉ. भारत खटी, रवींद्र बावनथडे, प्रशांत भृगुवार, दामोेदर अरगेला, बबलू हुसैन आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. अहीर म्हणाले, प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत करण्याच्या उद्देशाने भारतभर तिरंगा यात्रेचा कार्यक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. आता सरकारच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शूरवीरांचा व क्रांतिकारांचा ६०० पानांचा सोनेरी इतिहास लिहिल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशात दौरे करून भारताशी परकीयांचा संबंध वाढविला. तसेच परकीय गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणात वाढविली. केंद्र सरकारच्या वतीने सीमा सुरक्षा वाढविण्यात येणार असून त्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. देशातील आतंकवाद, नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत आहे, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद पिपरे, संचालन प्रशांत वाघरे यांनी केले तर आभार रवींद्र ओल्लालवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)