शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्य शासनाकडून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: December 28, 2015 00:19 IST

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़

लातूर : राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा या सरकारला विसर पडला आहे़ त्यांनी कोणतीही आश्वासने पाळली नाहीत़ ही जनतेची दिशाभूल आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी येथे व्यक्त केले़ महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या २१ व्या राज्य अधिवेशनाला रविवारी अहमदपुरातील चामे गार्डन येथे प्रारंभ झाला़ या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुलकुमार अंजान होते़ यावेळी माजीमंत्री बाळासाहेब जाधव, माजी आ़बाबासाहेब पाटील, शिवानंद हेंगणे, बाळासाहेब पाटील टाकळगावकर, निवृत्ती कांबळे, सिराजोद्दीन जहागिरदार, अ‍ॅड़ भगवानराव पौळ, माजी सभापती गुरुडे, ओमकार पाटील, बाबुराव कानगुले यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सरकारमध्ये सहभागी आहेत़ पण ते सरकारवर टीका करतात़ भाजपचे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नसल्याचे ते सांगतात़ सरकारने काहीच केले नाही, असे त्यांचे मत असेल तर ते आपल्या मंत्र्यांना राजीनामा देण्यास का सांगत नाहीत, असा सवालही अ‍ॅड़ आंबेडकर यांनी केला़ भाजप व सेनेची मिलीभगत असून, ते एकमेकांवर आरोप करुन जनतेला फसवत आहेत़ उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांचा खरच कळवळा असेल तर आणि भाजपचे सरकार काही करत नसेल तर ते सरकारमधून का बाहेर पडत नाहीत, असेही अ‍ॅड़ आंबेडकर म्हणाले़ प्रास्ताविक कॉ़महादेव गावंडे यांनी केले़ माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचेही समयोचित भाषण झाले़ सुत्रसंचालन गुणाले यांनी तर आभार राजीव पाटील यांनी मानले़ परिषदेला शेतकरी उपस्थित होते़