शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:14 AM

प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देदेसाईगंज तालुका : दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांना त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे.तालुक्यातील कुरूड फाट्यावरील प्रवासी निवारा पूर्णपणे जीर्ण झाला असून छतावरील सिमेंट पत्र्यांना मोठे भगदाड पडले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि थंडी यापासून प्रवाशांचे रक्षण व्हावे, यासाठी शासनाने हजारो रूपये खर्च करून गावोगावी प्रवासी निवारे बांधले. परंतु त्याच्या देखभालीची तरतूद केली नसल्याने बऱ्याच ठिकाणी निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. कुरूड फाट्यावरील प्रवासी निवाऱ्याची अवस्था अतिशय बिकट असून पावसाळ्यात तो कधीही कोसळू शकतो. प्रवासी निवाऱ्याच्या छतावरील सिमेंट पत्रे पूर्णत: फुटले असल्याने येथे प्रवासी विश्रांती घेऊ शकत नाही. त्याचबरोबर पाठीमागील भिंत खालून पोखरलेली आहे. ती कधी कोसळेल, याचा नेम नाही. काही दिवसातच शाळा, महाविद्यालय सुरू होत आहेत. त्यामुळे केवळ प्रवाशीच नाही तर विद्यार्थी सुद्धा शिक्षणासाठी ये-जा करताना प्रवासी निवाऱ्याचा आधार घेतात. परंतु देसाईगंज-आरमोरी, देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील अनेक प्रवासी निवाऱ्यांचीच दुरवस्था झाली असल्याने विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात कुठे आसरा घ्यावा, असा प्रश्न पडता आहे.संबंधित विभागाने किंवा ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रवासी निवाऱ्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरवर्षीच ही मागणी केली जाते. परंतु काहीच उपयोग होत नसल्याने रोष आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली