शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सदस्य गैरहजर; अविश्वास बारगळला

By admin | Updated: September 20, 2015 01:55 IST

येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत ...

जि.प.तील राजकारण : अध्यक्ष, उपाध्यक्ष, समाज कल्याण सभापतींना जीवदानगडचिरोली : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाजकल्याण सभापतीवर काही सदस्यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव शनिवारी बोलाविलेल्या विशेष सभेत एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने बारगळला. यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांना जीवदान मिळाले.आॅगस्ट महिन्यात विरोधकांकडून सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. परंतु त्यांचे मनसुबे हाणून पाडत जिल्हा परिषद अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे, उपाध्यक्ष जीवन नाट व समाजकल्याण सभापती विश्वनाथ भोवते यांनी अविश्वास प्रस्ताव नामंजूर करण्यासाठी लागणाऱ्या १८ सदस्यांची जुळवाजुळव करुन ५ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना व युवाशक्ती संघटनेच्या काही सदस्यांच्या सहया होत्या. हे सदस्य व आणखी काही सदस्य सहलीला रवाना झाले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हा परिषद सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी दुर्वेश सोनवणे हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मदतीला नायब तहसीलदार एम.एम. शेंडे व उपमुख्य कार्यपालन अधिकारी विजय मुळीक हेही सभागृहात उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेची वेळ होती. परंतु ५० पैकी एकही सदस्य सभागृहात उपस्थित झाला नाही. अविश्वास प्रस्ताव पारित होण्यासाठी ३४ सदस्यांची, तर फेटाळून लावण्यासाठी १७ सदस्यांची गरज होती. परंतु एकही सदस्य उपस्थित न राहिल्याने अविश्वास प्रस्ताव बारगळल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. अविश्वास बारगळल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांशी तसेच सदस्यांशी चर्चा केली. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात सिंचन प्रश्नावर भर देऊन काम केले जाईल. या कामासाठी आपण जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष कुत्तरमारे यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची धूरा स्वीकारल्यानंतर विविध आरोग्य केंद्र, पंचायत समिती यांना आकस्मिक भेटी देऊन अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई केली होती. आपल्या अध्यक्ष पदाच्या काळात सिंचन व्यवस्था बळकटीकरणासोबतच शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.