शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
3
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
4
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
5
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
6
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
7
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
8
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
9
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
10
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
11
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
12
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
13
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
14
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
15
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
16
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
17
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
18
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
19
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
20
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?

मुख्याध्यापक-अधीक्षकाशिवाय मसेलीच्या आश्रमशाळेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही.

ठळक मुद्देअपुरी व्यवस्था : सुविधांअभावी विद्यार्थ्यांचे होताहेत हाल

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. पण या शाळेत अनेक दिवसांपासून मुख्याध्यापक आणि अधीक्षकच नाहीत. परिणामी तिथे सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या आश्रमशाळेतील राजेश शबेरसिंग कुमरे या सातवीतील विद्यार्थ्याचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने आश्रमशाळेला भेट देऊन वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही. आश्रमशाळेच्या परिसरात अस्वच्छता आहे. एकाच खोलीत १२१ मुलांना कोंबून ठेवले जाते. ही मुले जेथे जेवन करतात व तिथेच झोपतात. जुन्या काळातील शाहाबादी फर्शी आहे. ही फर्शी अनेक ठिकाणी तुटली आहे. फर्शीच्या फटीमध्ये विंचू सारखे लहान सरपटणारे प्राणी राहण्याची शक्यता आहे.मुले ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नेहमीच ओलावा राहतो. बेड पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी मोठमोठे सौरयंत्र लावले आहेत. मात्र हे मागील अनेक वर्षांपासून ते बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे.त्या विद्यार्थ्याचा मृत्यू दम्यामुळे?दोन दिवसांपूर्वी या आश्रमशाळेत वर्ग ७ मध्ये शिकणाºया राजेश कुमरे या विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याला पहाटे रुग्णालयात आणले पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याने शवपरिक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला दम्याचा अटॅक येऊन त्यातच त्याचा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतू सर्पदंश झाल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे नेमका मृत्यू दम्यामुळे झाला की सर्पदंशाने हे गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :Schoolशाळा