शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

मुख्याध्यापक-अधीक्षकाशिवाय मसेलीच्या आश्रमशाळेचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST

मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही.

ठळक मुद्देअपुरी व्यवस्था : सुविधांअभावी विद्यार्थ्यांचे होताहेत हाल

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. पण या शाळेत अनेक दिवसांपासून मुख्याध्यापक आणि अधीक्षकच नाहीत. परिणामी तिथे सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या आश्रमशाळेतील राजेश शबेरसिंग कुमरे या सातवीतील विद्यार्थ्याचा दोन दिवसांपूर्वी संशयास्पद मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सदर प्रतिनिधीने आश्रमशाळेला भेट देऊन वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.मसेली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे शासकीय आश्रमशाळा चालविली जाते. या आश्रमशाळेत एकूण १२१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळेत पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही किंवा अधीक्षकही नाही. शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. वरिष्ठ व जबाबदार अधिकारी नसल्याने येथील कर्मचारी जबाबदारीने काम करीत नाही. आश्रमशाळेच्या परिसरात अस्वच्छता आहे. एकाच खोलीत १२१ मुलांना कोंबून ठेवले जाते. ही मुले जेथे जेवन करतात व तिथेच झोपतात. जुन्या काळातील शाहाबादी फर्शी आहे. ही फर्शी अनेक ठिकाणी तुटली आहे. फर्शीच्या फटीमध्ये विंचू सारखे लहान सरपटणारे प्राणी राहण्याची शक्यता आहे.मुले ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी नेहमीच ओलावा राहतो. बेड पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी मोठमोठे सौरयंत्र लावले आहेत. मात्र हे मागील अनेक वर्षांपासून ते बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना थंड पाण्यानेच आंघोळ करावी लागत आहे.त्या विद्यार्थ्याचा मृत्यू दम्यामुळे?दोन दिवसांपूर्वी या आश्रमशाळेत वर्ग ७ मध्ये शिकणाºया राजेश कुमरे या विद्यार्थ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. त्याला पहाटे रुग्णालयात आणले पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याने शवपरिक्षण करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याला दम्याचा अटॅक येऊन त्यातच त्याचा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतू सर्पदंश झाल्यानंतरही श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे नेमका मृत्यू दम्यामुळे झाला की सर्पदंशाने हे गुलदस्त्यातच आहे.

टॅग्स :Schoolशाळा