शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

अनेक ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली नाही

By admin | Updated: August 25, 2016 01:02 IST

१५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत

कोरमचा अभाव : ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांची अनास्थागडचिरोली : १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहनानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेऊन गाव विकासाबाबत चर्चा करून ठोस निर्णय घेण्यात यावे, असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रशासनाला दिले होते. मात्र जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात गाव विकासाबाबत प्रचंड उदासीनता असल्याने कोरमअभावी जिल्ह्यातील १०० वर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभाच झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत ११ विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या विषयांचा सूचीमध्ये समावेश करण्यात आला होता. यामध्ये बालकल्याण विभागाअंतर्गत ज्या अंगणवाडी केंद्रांना इमारत नसेल, त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे तसेच जीर्ण झालेल्या अंगणवाडी इमारतीचे निर्लेखन करण्याचे प्रस्ताव तयार करावे, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, कृषी विभागाअंतर्गत आदिवासी उपययोजना, अनुसूचित जाती उपययोजनेच्या लाभार्थ्यांची निवड करणे, मामा तलाव दुरूस्ती तसेच कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करणे, दुरूस्ती करणे आदी विषय ठेवून त्यास ग्रामसभेची मंजुरी प्रदान करावी आदी बाबींचा समावेश होता. याशिवाय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, पाणीपुरवठा योजना, मुलींना सायकल वाटप, मनरेगाच्या कामाचा आराखड्याला मंजुरी देणे, निर्मल भारत अभियानातून शौचालयाची कामे तसेच समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांच्या कार्यवाहीला मंजुरी देण्याचा विशेष सूचीमध्ये समावेश होता. गावाचा विकास आराखड्याला मंजुरी प्रदान करण्याचा महत्त्वाचा अधिकार ग्रामसभेला शासनाने प्रदान केला आहे. मात्र अनेक गावात काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांची मर्जी विकास कामात खपवून घेतली जाते. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक मतदार ग्रामसभेकडे पाठ फिरवित असल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)