शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

झाडे तोडणारे अनेक शेतकरी सापडले अडचणीत

By admin | Updated: February 22, 2017 01:58 IST

परिसरातील रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीतील झाडे तोडून ती विटाभट्टीधारकांना विकली.

सातबारावर नोंदीचा अभाव : मालकी हक्कासाठी आंदोलन छेडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा जोगीसाखरा : परिसरातील रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीतील झाडे तोडून ती विटाभट्टीधारकांना विकली. त्यानंतर वन विभागाने विटाभट्टीवर धाड टाकून काही विटाभट्टी मालकांवर गुन्हा दाखल केला. पुन्हा शेतकऱ्यांची या प्रकरणी कसून चौकशी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या मालकी हक्कानुसार त्यांच्या जमिनीतील आडजातीचे झाडे तोडण्यासाठी सरसकट परवानगी देण्यात यावी, या मागणीला घेऊन शेतकरी वन परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. वनकायद्याची जाण नसलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या स्वमालकीच्या जमिनीतील स्वत: लावलेल्या झाडांची नोंदणी सातबारावर केली नाही. मात्र जास्त वय झालेल्या झाडाला फळ येत नसल्याने तसेच सदर झाडांचा धान्य व इतर पिकांसाठी धोका लक्षात घेऊन अशा झाडांना तोडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. आंबा, मोह, कडूनिम या जातीचे झाडे तोडून ते विटा व्यावसायिकांना विकले. सदर झाडे वन विभागाच्या जंगलातील नव्हती. मात्र सदर झाडांची नोंद सातबारावर नसून वन विभागाकडे तोडण्याची परवानगी मागितली नाही. या कारणास्तव वन विभागाने कुठलीही चौकशी न करता वन कायद्यांतर्गत विटाभट्टी व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले. तसेच विटाभट्टी व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून घेतलेला संपूर्ण माल वन विभागाच्या डेपोत जमा केला. विटा व्यावसायिकांवर कारवाई झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शेतकऱ्यांचा मालकी हक्क असतानाही वन विभागाने ही कारवाई केल्याने शेतकरी तसेच विटाभट्टी व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले आहेत. दुसरीकडे वन विभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड होते. मात्र वन विभागाचे संबंधित कर्मचारी यांचेवर तसेच तस्करांवर फारशी कारवाई होत नाही. आपल्या अधिकार व हक्कासाठी रामपूर, आष्टा, पाथरगोटा, अतरंजी, सालमारा येथील शेतकरी आरमोरी वन परिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. शेतजमिनीतील झाडांची सातबारावर नोंद नसल्याने शेतकऱ्यांपुढे ही अडचण निर्माण झाली आहे. वन विभाग व महसूल विभागाच्या प्रभावी जनजागृतीअभावी स्वत:च्या शेतजमिनीतील नोंद अनेक शेतकऱ्यांनी सातबारावर केली नाही. (वार्ताहर)