शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

निर्माल्यापासून खत निर्मिती होणार

By admin | Updated: September 14, 2016 01:40 IST

बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे.

पालिका प्रशासनाचा पुढाकार : विसर्जनातील निर्माल्य कचराकुंडीत टाकण्याचे आवाहनगडचिरोली : बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र यंदा प्रथमच गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. गणेश विसर्जनातील निर्माल्य न.प. कामगारांमार्फत एकत्र करून त्याच्यापासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. रविवारपासून गडचिरोली शहरात गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन गोकुलनगर लगतच्या तलावात करण्यात येते. मात्र सार्वजनिक मंडळाचे काही कार्यकर्ते व लोक विसर्जनानंतर कुठेही अस्ताव्यस्त हार, फुले, नारळ आदी निर्माल्य टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. पालिकेच्या वतीने येथे पूर्वी घंटागाडीची व्यवस्था करण्यात येत नव्हती. मात्र राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानचा नारा दिल्यापासून गडचिरोली शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेची काही प्रमाणात काळजी घेतली जात आहे. निर्माल्य व पुजेचे साहित्य अस्ताव्यस्त कुठेही न फेकता ते निर्माल्य तलावाच्या पाळीवर ठेवण्यात आलेल्या घंटागाडीतच टाकावे, अशा सूचनेचे फलक तलावाच्या पाळीवर लावण्यात आले आहे. येथील निर्माल्य रोजच्या रोज घंटागाडीद्वारे खरपुंडी नाक्याजवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत टाकले जात आहे. गणपती नंतर शारदा, दुर्गा उत्सव आटोपल्यावर हार, फुले, नारळ व इतर साहित्य स्वतंत्र करण्यात येणार आहे. येथे खत निर्मितीची प्रक्रिया करण्यात येईल, अशी खात्रीशीर माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनातील निर्माल्य इतरत्र अस्ताव्यस्त टाकू नये, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने व नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून तलाव परिसरात पालिकेचे तीन ते चार कामगार हजर राहून तलावाच्या पायऱ्यांवर फेकलेले निर्माल्य उचलण्याचे कामही करीत आहेत. याशिवाय न.प.चे कामगार दररोज या ठिकाणी येऊन पायऱ्यावरील केरकचरा तसेच निर्माल्य उचलून स्वच्छता करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्राणहानी टाळण्यासाठी स्पीडबोटची व्यवस्थागोकुलनगर लगतच्या तलावाच्या पात्रात प्रचंड पाणीसाठा आहे. पाळीच्या खाली पायऱ्या लगतही १५ फूट पाणी आहे. या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खांब उभारून कठडे तयार करण्यात आले आहे. मात्र उत्साहाच्या भरात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविक कठड्याच्या पलिकडे जाऊन मूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रयत्न करू शकतात. सदर तलावपात्रात प्राणहानी होऊ नये, यासाठी पोलीस विभागातर्फे येथे मंगळवारी मोठ्या स्वरूपाची स्पीड बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर स्पीड बोट पोलीस मुख्यालयातून गडचिरोली शहर पोलिसांनी येथे आणली आहे. याशिवाय मंगळवारपासून तलावाच्या पाळीवर ५० वर पोलीस व गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत.