शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निर्माल्यापासून खत निर्मिती होणार

By admin | Updated: September 14, 2016 01:40 IST

बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे.

पालिका प्रशासनाचा पुढाकार : विसर्जनातील निर्माल्य कचराकुंडीत टाकण्याचे आवाहनगडचिरोली : बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र यंदा प्रथमच गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. गणेश विसर्जनातील निर्माल्य न.प. कामगारांमार्फत एकत्र करून त्याच्यापासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. रविवारपासून गडचिरोली शहरात गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन गोकुलनगर लगतच्या तलावात करण्यात येते. मात्र सार्वजनिक मंडळाचे काही कार्यकर्ते व लोक विसर्जनानंतर कुठेही अस्ताव्यस्त हार, फुले, नारळ आदी निर्माल्य टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. पालिकेच्या वतीने येथे पूर्वी घंटागाडीची व्यवस्था करण्यात येत नव्हती. मात्र राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानचा नारा दिल्यापासून गडचिरोली शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेची काही प्रमाणात काळजी घेतली जात आहे. निर्माल्य व पुजेचे साहित्य अस्ताव्यस्त कुठेही न फेकता ते निर्माल्य तलावाच्या पाळीवर ठेवण्यात आलेल्या घंटागाडीतच टाकावे, अशा सूचनेचे फलक तलावाच्या पाळीवर लावण्यात आले आहे. येथील निर्माल्य रोजच्या रोज घंटागाडीद्वारे खरपुंडी नाक्याजवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत टाकले जात आहे. गणपती नंतर शारदा, दुर्गा उत्सव आटोपल्यावर हार, फुले, नारळ व इतर साहित्य स्वतंत्र करण्यात येणार आहे. येथे खत निर्मितीची प्रक्रिया करण्यात येईल, अशी खात्रीशीर माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनातील निर्माल्य इतरत्र अस्ताव्यस्त टाकू नये, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने व नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून तलाव परिसरात पालिकेचे तीन ते चार कामगार हजर राहून तलावाच्या पायऱ्यांवर फेकलेले निर्माल्य उचलण्याचे कामही करीत आहेत. याशिवाय न.प.चे कामगार दररोज या ठिकाणी येऊन पायऱ्यावरील केरकचरा तसेच निर्माल्य उचलून स्वच्छता करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्राणहानी टाळण्यासाठी स्पीडबोटची व्यवस्थागोकुलनगर लगतच्या तलावाच्या पात्रात प्रचंड पाणीसाठा आहे. पाळीच्या खाली पायऱ्या लगतही १५ फूट पाणी आहे. या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खांब उभारून कठडे तयार करण्यात आले आहे. मात्र उत्साहाच्या भरात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविक कठड्याच्या पलिकडे जाऊन मूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रयत्न करू शकतात. सदर तलावपात्रात प्राणहानी होऊ नये, यासाठी पोलीस विभागातर्फे येथे मंगळवारी मोठ्या स्वरूपाची स्पीड बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर स्पीड बोट पोलीस मुख्यालयातून गडचिरोली शहर पोलिसांनी येथे आणली आहे. याशिवाय मंगळवारपासून तलावाच्या पाळीवर ५० वर पोलीस व गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत.