शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

निर्माल्यापासून खत निर्मिती होणार

By admin | Updated: September 14, 2016 01:40 IST

बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे.

पालिका प्रशासनाचा पुढाकार : विसर्जनातील निर्माल्य कचराकुंडीत टाकण्याचे आवाहनगडचिरोली : बहुतांश टाकाऊ वस्तूंपासून सेंद्रीय खत निर्मिती शक्य आहे. तसा प्रयोग राज्याच्या काही भागात सुरू आहे. मात्र यंदा प्रथमच गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला आहे. गणेश विसर्जनातील निर्माल्य न.प. कामगारांमार्फत एकत्र करून त्याच्यापासून सेंद्रीय खत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याने निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्मिती होणार आहे. रविवारपासून गडचिरोली शहरात गणेश विसर्जनाची धूम सुरू झाली आहे. शहरातील बहुतांश सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे विसर्जन गोकुलनगर लगतच्या तलावात करण्यात येते. मात्र सार्वजनिक मंडळाचे काही कार्यकर्ते व लोक विसर्जनानंतर कुठेही अस्ताव्यस्त हार, फुले, नारळ आदी निर्माल्य टाकतात. त्यामुळे अस्वच्छता पसरते. पालिकेच्या वतीने येथे पूर्वी घंटागाडीची व्यवस्था करण्यात येत नव्हती. मात्र राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानचा नारा दिल्यापासून गडचिरोली शहरात पालिकेच्या वतीने स्वच्छतेची काही प्रमाणात काळजी घेतली जात आहे. निर्माल्य व पुजेचे साहित्य अस्ताव्यस्त कुठेही न फेकता ते निर्माल्य तलावाच्या पाळीवर ठेवण्यात आलेल्या घंटागाडीतच टाकावे, अशा सूचनेचे फलक तलावाच्या पाळीवर लावण्यात आले आहे. येथील निर्माल्य रोजच्या रोज घंटागाडीद्वारे खरपुंडी नाक्याजवळील पालिकेच्या मोकळ्या जागेत टाकले जात आहे. गणपती नंतर शारदा, दुर्गा उत्सव आटोपल्यावर हार, फुले, नारळ व इतर साहित्य स्वतंत्र करण्यात येणार आहे. येथे खत निर्मितीची प्रक्रिया करण्यात येईल, अशी खात्रीशीर माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जनातील निर्माल्य इतरत्र अस्ताव्यस्त टाकू नये, असे आवाहन नगर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने व नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यांनी केले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून तलाव परिसरात पालिकेचे तीन ते चार कामगार हजर राहून तलावाच्या पायऱ्यांवर फेकलेले निर्माल्य उचलण्याचे कामही करीत आहेत. याशिवाय न.प.चे कामगार दररोज या ठिकाणी येऊन पायऱ्यावरील केरकचरा तसेच निर्माल्य उचलून स्वच्छता करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)प्राणहानी टाळण्यासाठी स्पीडबोटची व्यवस्थागोकुलनगर लगतच्या तलावाच्या पात्रात प्रचंड पाणीसाठा आहे. पाळीच्या खाली पायऱ्या लगतही १५ फूट पाणी आहे. या परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून खांब उभारून कठडे तयार करण्यात आले आहे. मात्र उत्साहाच्या भरात सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते तसेच भाविक कठड्याच्या पलिकडे जाऊन मूर्तीचे विसर्जन करण्याचा प्रयत्न करू शकतात. सदर तलावपात्रात प्राणहानी होऊ नये, यासाठी पोलीस विभागातर्फे येथे मंगळवारी मोठ्या स्वरूपाची स्पीड बोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. सदर स्पीड बोट पोलीस मुख्यालयातून गडचिरोली शहर पोलिसांनी येथे आणली आहे. याशिवाय मंगळवारपासून तलावाच्या पाळीवर ५० वर पोलीस व गृहरक्षक तैनात करण्यात आले आहेत.