शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

शंकरनगरात फुलली मक्याची शेती

By admin | Updated: February 20, 2017 00:38 IST

जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे.

७० हेक्टर क्षेत्रावर लागवड : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीभिमराव मेश्राम जोगीसाखराजोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे. त्याचबरोबर रबी हंगामात भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल ते मे पर्यंत रोजगार उपलब्ध होणार असून लाखो रूपयांचे उत्पन्नही मिळण्यास मदत होणार आहे. शंकरनगर येथील शेतकऱ्यांची शेती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.जोगीसाखरापासून तीन किमी अंतरावर १९६५ मध्ये शंकरनगर हे गाव वसविण्यात आले. या गावात एकूण १२३ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावातील नागरिक बांगला देशातील निर्वासीत असल्याने त्यांना शासनाकडून प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कुटुंब वाढल्याने जमिनीचे तुकडे पडले. तरीही बंगाली समाजातील हा शेतकरी कधीच मागे हटला नाही. या शेतकऱ्यांनी स्वत:च्या मेहनतीने शेतात विहीर खोदली आहे. या विहिरीच्या माध्यमातून दरवर्षी विविध हंगामात विविध प्रकारची पिके हा शेतकरी घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मका पिकासाठी चांगले असल्याने भरघोस उत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून रबी हंगामात मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली. यावर्षी सुमारे ७० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. हिरवेगार मक्याची पिक या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मका पिकाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचा बहाणा करीत बहुतांश शेतकरी खरीपातील धानाव्यतिरिक्त इतर कोणतेच पीक घेत नाही. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. मात्र शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी हे कारण कधीचेच नाकारले आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून सिंचन करून रबी तसेच उन्हाळी पिकांचेही ते उत्पादन घेत आहेत. फळांचेही उत्पादन वाढलेशंकरनगर येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. मक्याबरोबरच येथील शेतकरी कारले, चवळी, टमाटर, वांगे, आलू यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. शेतातील पारीवर आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. यातूनही येथील शेतकऱ्यांना बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास मदत होते, अशी माहिती पुरंजन मंडल या शेतकऱ्याने दिली.शेतीमध्ये राबताना नशीबाला दोष न देताना आम्ही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. शंकरनगर येथे पिकणारा दर्जेदार भाजीपाला, फळे, मका, आंबा नागपूर येथील बाजारपेठेत पाठविला जात आहे. मात्र कृषी विभागाचे आमच्या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीविषयची नवीन माहिती कृषी विभाग आपल्याला देत नाही. शेती हा व्यवसाय आहे. तो सर्व कुटुंबांनी मिळून चालवायचा आहे. जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी पाणी,खत वेळेवर द्यावे लागते.- सुप्रीया सुपेन बाला, शेतकरी, शंकरनगर