शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

शंकरनगरात फुलली मक्याची शेती

By admin | Updated: February 20, 2017 00:38 IST

जोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे.

७० हेक्टर क्षेत्रावर लागवड : जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायीभिमराव मेश्राम जोगीसाखराजोगीसाखरा परिसरातील शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी जवळपास ७० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी मका पिकाची लागवड केली आहे. त्याचबरोबर रबी हंगामात भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. यातून प्रत्येक शेतकऱ्याला एप्रिल ते मे पर्यंत रोजगार उपलब्ध होणार असून लाखो रूपयांचे उत्पन्नही मिळण्यास मदत होणार आहे. शंकरनगर येथील शेतकऱ्यांची शेती जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.जोगीसाखरापासून तीन किमी अंतरावर १९६५ मध्ये शंकरनगर हे गाव वसविण्यात आले. या गावात एकूण १२३ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावातील नागरिक बांगला देशातील निर्वासीत असल्याने त्यांना शासनाकडून प्रत्येकी पाच एकर जमिनीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कुटुंब वाढल्याने जमिनीचे तुकडे पडले. तरीही बंगाली समाजातील हा शेतकरी कधीच मागे हटला नाही. या शेतकऱ्यांनी स्वत:च्या मेहनतीने शेतात विहीर खोदली आहे. या विहिरीच्या माध्यमातून दरवर्षी विविध हंगामात विविध प्रकारची पिके हा शेतकरी घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण मका पिकासाठी चांगले असल्याने भरघोस उत्पादन होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून रबी हंगामात मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली. यावर्षी सुमारे ७० हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी केली आहे. हिरवेगार मक्याची पिक या परिसरातील इतर शेतकऱ्यांचे लक्ष वेधत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मका पिकाच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचा बहाणा करीत बहुतांश शेतकरी खरीपातील धानाव्यतिरिक्त इतर कोणतेच पीक घेत नाही. यासाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. मात्र शंकरनगर येथील शेतकऱ्यांनी हे कारण कधीचेच नाकारले आहे. विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून सिंचन करून रबी तसेच उन्हाळी पिकांचेही ते उत्पादन घेत आहेत. फळांचेही उत्पादन वाढलेशंकरनगर येथील शेतकरी आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेतात. मक्याबरोबरच येथील शेतकरी कारले, चवळी, टमाटर, वांगे, आलू यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. शेतातील पारीवर आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत. यातूनही येथील शेतकऱ्यांना बिनाखर्ची उत्पादन मिळण्यास मदत होते, अशी माहिती पुरंजन मंडल या शेतकऱ्याने दिली.शेतीमध्ये राबताना नशीबाला दोष न देताना आम्ही आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतो. शंकरनगर येथे पिकणारा दर्जेदार भाजीपाला, फळे, मका, आंबा नागपूर येथील बाजारपेठेत पाठविला जात आहे. मात्र कृषी विभागाचे आमच्या गावाकडे दुर्लक्ष झाले आहे. शेतीविषयची नवीन माहिती कृषी विभाग आपल्याला देत नाही. शेती हा व्यवसाय आहे. तो सर्व कुटुंबांनी मिळून चालवायचा आहे. जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यासाठी पाणी,खत वेळेवर द्यावे लागते.- सुप्रीया सुपेन बाला, शेतकरी, शंकरनगर