शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
3
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
4
मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
5
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
6
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
7
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
8
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
9
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
10
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
12
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
13
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
14
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
15
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
16
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
17
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
18
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
19
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
20
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

यावर्षीच्या हंगामात 23 हजार हेक्टरवर रबी पिकांचे नियाेजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 05:00 IST

खरीप हंगामात प्रामुख्याने धान, कापूस, साेयाबीन या पिकांची लागवड हाेते. धान पीक निघाल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत काही शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची लागवड करतात. तर काही शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध आहे. खरिपात या ठिकाणी काेणतेही पीक घेतले जात नाही. विविध याेजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जात आहे. तसेच अत्यंत कमी किमतीत वीज जाेडणी उपलब्ध करून दिली जात आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : यावर्षीच्या रब्बी हंगामात सुमारे २३ हजार हेक्टरवर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियाेजन करण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला. त्यामुळे रब्बी पिकांचे क्षेत्र वाढेल, अशी अपेक्षा आहे. तसेच यापूर्वीच पेरणी झालेल्या पिकांसाठी अवकाळी पाऊस वरदान ठरला आहे. खरीप हंगामात प्रामुख्याने धान, कापूस, साेयाबीन या पिकांची लागवड हाेते. धान पीक निघाल्यानंतर त्याच धानाच्या बांधीत काही शेतकरी रब्बी हंगामातील पिकांची लागवड करतात. तर काही शेतकऱ्यांकडे रब्बी हंगामासाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध आहे. खरिपात या ठिकाणी काेणतेही पीक घेतले जात नाही. विविध याेजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहिरींचा लाभ दिला जात आहे. तसेच अत्यंत कमी किमतीत वीज जाेडणी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे  सिंचनाची सुविधा निर्माण हाेऊन दरवर्षी रब्बीचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

६००० हेक्टरवर पेरणी पूर्ण

मागील आठवड्यात प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हाभरात ६ हजार ३४७ हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाल्याची नाेंद आहे. हा कृषी विभागाचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात या पेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. काही शेतकरी हलके धान निघाल्याबराेबरच पिकांची लागवड करतात. हे पीक आता हिरवेगार झाले आहे. कृषी विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार ४४५ हेक्टरवर भुईमुगाची लागवड करण्यात आली आहे. त्यापाठाेपाठ १४७ हेक्टरवर करडई, ७७ हेक्टरवर जवस व २२ हेक्टरवर माेहरी लागवड करण्यात आली आहे. तेल बियांच्या पिकांच्या उत्पादनांना चांगली मागणी असल्याने काही शेतकरी या पिकांकडे वळत चालला आहे. 

लाखाेळी पिकाची सर्वाधिक लागवडधानाच्या बांधीत लाखाेळीचे पीक घेतले जाते. यामध्ये धान पीक कापणीच्या काही दिवसांपूर्वी बांधीत लाखाेळीचे बियाणे टाकले जातात. लाखाेळी पिकासाठी काेणतेही अतिरिक्त खत, मशागत किंवा कीटकनाशकांची फवारणी करावी लागत नाही. अत्यंत कमी खर्चात लाखाेळीचे उत्पादन घेता येत असल्याने अनेक शेतकरी या पिकाची लागवड करतात. गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ५ हजार हेक्टर क्षेत्रावर लाखाेळी पिकाची लागवड केली जाते. 

२ हजार हेक्टरवर मक्याची लागवडजिल्ह्यातील शेतकरी मका पिकाकडे वळत चालला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर व इतर सिंचनाच्या सुविधा आहेत, असे शेतकरी मका पिकाची हमखास लागवड करतात. यावर्षी २ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड हाेईल, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक हेक्टरवरही मका पिकाची लागवड हाेऊ शकते. मका पिकाचे उत्पादन चांगले हाेते मात्र भाव अतिशय कमी आहे. भाव वाढल्यास आणखी मक्याचे क्षेत्र वाढू शकते.

 

टॅग्स :agricultureशेती