शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाअभावी मामा तलाव झाले कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छोट्या-छोट्या गावतलावांच्या, अर्थात माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या बाबतीत गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांप्रमाणेच गडचिरोली जिल्हाही समृद्ध आहे. जिल्हाभरात अशा १६४५ मामा तलावांची नोंद आहे. त्यातील पाण्यातून २५ हजार १९५ हेक्टर शेतीला सिंचन करण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील बहुतांश तलाव सध्या शेतीच्या सिंचनाऐवजी केवळ गावातील कपडे धुणे आणि गुरांच्या अंघोळीपुरते मर्यादित झाले आहेत. अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

निधी मिळाल्यास वाढू शकते सिंचन

-    या जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील मामा तलावांमधील साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण, गेट व कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे. 

-    हा निधी नसल्यामुळे या तलावांमधून क्षमतेएवढे सिंचन होऊ शकत नाही. वास्तविक मूळ क्षमतेनुसार या तलावांमध्ये ४६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे, पण गाळ आणि गेट फुटलेले असल्यामुळे तेवढा पाणीसाठा या तलावांमध्ये होत नाही.

साठवण क्षमता घटलीया पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना पहिला हक्क अजूनही संबंधित मालगुजार किंवा त्यांनी ज्यांना हक्क दिले त्यांचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करता येतो, पण १६४५ मामा तलावांपैकी ३० ते ४० टक्के तलावांमध्ये गाळ साचलेला आहे. त्याचा उपसा झाला नसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प