शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

सिंचनाअभावी मामा तलाव झाले कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 05:00 IST

अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : छोट्या-छोट्या गावतलावांच्या, अर्थात माजी मालगुजारी (मामा) तलावांच्या बाबतीत गोंदिया-भंडारा या जिल्ह्यांप्रमाणेच गडचिरोली जिल्हाही समृद्ध आहे. जिल्हाभरात अशा १६४५ मामा तलावांची नोंद आहे. त्यातील पाण्यातून २५ हजार १९५ हेक्टर शेतीला सिंचन करण्याची क्षमता आहे. मात्र, प्रत्यक्षात यातील बहुतांश तलाव सध्या शेतीच्या सिंचनाऐवजी केवळ गावातील कपडे धुणे आणि गुरांच्या अंघोळीपुरते मर्यादित झाले आहेत. अपेक्षित सिंचनासाठी पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचा लघुपाटबंधारे विभाग या तलावांचे व्यवस्थापन पाहते. पूर्वी या तलावातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीच नाही, तर गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही केला जात होता, पण आता त्यातील पाणी शुद्ध राहिलेले नाही. गावातील महिलावर्ग या पाण्याचा वापर कपडे धुण्यासाठी करतात.

निधी मिळाल्यास वाढू शकते सिंचन

-    या जिल्ह्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील मामा तलावांमधील साठवण क्षमता वाढविण्यासाठी तलावांचे खोलीकरण, गेट व कालव्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. त्यासाठी पुरेशा निधीची गरज आहे. 

-    हा निधी नसल्यामुळे या तलावांमधून क्षमतेएवढे सिंचन होऊ शकत नाही. वास्तविक मूळ क्षमतेनुसार या तलावांमध्ये ४६ दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे, पण गाळ आणि गेट फुटलेले असल्यामुळे तेवढा पाणीसाठा या तलावांमध्ये होत नाही.

साठवण क्षमता घटलीया पाण्याचा सिंचनासाठी वापर करताना पहिला हक्क अजूनही संबंधित मालगुजार किंवा त्यांनी ज्यांना हक्क दिले त्यांचा आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या पाण्याचा वापर करता येतो, पण १६४५ मामा तलावांपैकी ३० ते ४० टक्के तलावांमध्ये गाळ साचलेला आहे. त्याचा उपसा झाला नसल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प