शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

६५९ गावांमध्ये राबविणार हिवताप सर्वेक्षण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 05:00 IST

शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगली भूभागामुळे हिवतापाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या जिल्ह्यात हिवताप सर्वेक्षणासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती मनोहर पोरेटी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला. दि. १७ फेब्रुवारी ते २० मार्च यादरम्यान ही हिवताप शोधमोहीम ६५९ गावांमध्ये राबविली जाणार आहे.विशेष हिवताप सर्वेक्षण मोहीम ही जंतूभार १० व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. यासाठी ५ तालुके, १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १११ उपकेंद्र आणि ६५९ गावांची निवड करण्यात आली आहे. त्या गावांमधील आशा वर्कर आणि ९१ क्षेत्र कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करणार आहेत. शासनाने २०२१-२२ या आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रिय संक्रमण होत आहे. त्यामुळे हिवतापाचा समूळ नायनाट करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत २ लाख २० हजार ७९६ लोकांचे रक्तनमुने आणि १४ हजार ४४ लोकांची आरडीकेद्वारा तपासणी होणार आहे. आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य ॲड. राम मेश्राम, रुपाली पंदीलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषकुमार जठार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री आणि जिल्हा हिवताप अधिकारी व डॉ. कुणाल मोडक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीतजिल्ह्यातील अनेक गावांची लोकसंख्या फक्त ५० ते ६० असल्यामुळे गावात हिवतापाचा १ किंवा २ रुग्ण आढळला तरी हिवतापाचा इन्डिकेटर २० व त्यापेक्षा जास्त आढळतो. तसेच मान्सून कालावधीत ३० टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मलेरियाच्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्ह्यातील असतात, त्यामुळे हिवताप निर्मूलन करण्याकरिता विशेष उपाययोजनांची आवश्यकता असते.

 

टॅग्स :Healthआरोग्य