शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

महाराष्ट्र-तेलंगणा करार घटनाबाह्य

By admin | Updated: March 12, 2016 01:40 IST

गोदावरी व प्राणहिता नदीवरील सिंचन प्रकल्पांबाबत महाराष्ट्र-तेलंगणा राज्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

उसेंडी यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनगडचिरोली : गोदावरी व प्राणहिता नदीवरील सिंचन प्रकल्पांबाबत महाराष्ट्र-तेलंगणा राज्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. मात्र या करारासाठी ग्रामसभांची मान्यता घेण्यात न आल्यामुळे सदर करार रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी व प्राणहिता नदीवरील मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्प, कन्यापल्ली-भूपालपल्ली उपसा सिंचन योजना, जयपूर पॉवर प्लॉन्टला पाणीपुरवठा करण्यासाठी देलनवाडा येथे बांधण्यात आलेला बंधारा याबाबत महाराष्ट्र व तेलंगणा राज्याने सामंजस्य करार केला आहे. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सह्या केल्या आहेत. मात्र करारादरम्यान काही घटनात्मक मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बाधित होणारी गावे व परिसर हे अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात. पेसा कायद्यानुसार या भागात सिंचन प्रकल्प व इतर विकास कामे करण्यापूर्वी ग्रामसभेची सहमती घेणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही महाराष्ट्र व तेलंगणा शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता करार केला आहे. सदर करार घटनाबाह्य असल्याचा आरोप डॉ. उसेंडी यांनी केला आहे. नक्षलग्रस्त व अविकसित भागातील लोकांवर अन्यायकारक आहे. १९८० च्या वनसंवर्धन कायद्यामुळे तुलतुली, कारवाफा, चेन्ना, डुरकानगुड्रा आदी सिंचन प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून तेलंगणाला पाणी देण्यासाठी मात्र सकारात्मक भूमिका शासन घेत आहे. महाराष्ट्र शासनाची ही भूमिका आदिवासींवर अन्यायकारक असल्याने सदर करार रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना काँग्रेसच्या शिष्टमंडळात हसनअली गिलानी, सतीश विधाते, भावना वानखेडे, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रकाश ताकसांडे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, नंदू वाईलकर, अमिता मडावी, कुणाल पेंदोरकर, गौरव अलाम, तौफिक शेख, राकेश गणवीर, प्रतिभा जुमनाके, रामचंद्र गोटा, एजाज शेख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)