शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

महाराष्ट्र-तेलंगणा करार घटनाबाह्य

By admin | Updated: March 12, 2016 01:40 IST

गोदावरी व प्राणहिता नदीवरील सिंचन प्रकल्पांबाबत महाराष्ट्र-तेलंगणा राज्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे.

उसेंडी यांचा आरोप : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनगडचिरोली : गोदावरी व प्राणहिता नदीवरील सिंचन प्रकल्पांबाबत महाराष्ट्र-तेलंगणा राज्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. मात्र या करारासाठी ग्रामसभांची मान्यता घेण्यात न आल्यामुळे सदर करार रद्द करावा, अशी मागणी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी व प्राणहिता नदीवरील मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्प, कन्यापल्ली-भूपालपल्ली उपसा सिंचन योजना, जयपूर पॉवर प्लॉन्टला पाणीपुरवठा करण्यासाठी देलनवाडा येथे बांधण्यात आलेला बंधारा याबाबत महाराष्ट्र व तेलंगणा राज्याने सामंजस्य करार केला आहे. या करारावर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सह्या केल्या आहेत. मात्र करारादरम्यान काही घटनात्मक मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बाधित होणारी गावे व परिसर हे अनुसूचित क्षेत्रामध्ये येतात. पेसा कायद्यानुसार या भागात सिंचन प्रकल्प व इतर विकास कामे करण्यापूर्वी ग्रामसभेची सहमती घेणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही महाराष्ट्र व तेलंगणा शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता करार केला आहे. सदर करार घटनाबाह्य असल्याचा आरोप डॉ. उसेंडी यांनी केला आहे. नक्षलग्रस्त व अविकसित भागातील लोकांवर अन्यायकारक आहे. १९८० च्या वनसंवर्धन कायद्यामुळे तुलतुली, कारवाफा, चेन्ना, डुरकानगुड्रा आदी सिंचन प्रकल्प रखडले आहेत. हे प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसून तेलंगणाला पाणी देण्यासाठी मात्र सकारात्मक भूमिका शासन घेत आहे. महाराष्ट्र शासनाची ही भूमिका आदिवासींवर अन्यायकारक असल्याने सदर करार रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना काँग्रेसच्या शिष्टमंडळात हसनअली गिलानी, सतीश विधाते, भावना वानखेडे, महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रकाश ताकसांडे, रजनीकांत मोटघरे, अमोल भडांगे, नंदू वाईलकर, अमिता मडावी, कुणाल पेंदोरकर, गौरव अलाम, तौफिक शेख, राकेश गणवीर, प्रतिभा जुमनाके, रामचंद्र गोटा, एजाज शेख उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)