शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

महाग्रामसभेची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण ...

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी बुधवार, १० फेब्रुवारीला दुपारी १ वाजता गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार सी. आर. भंडारी यांना देण्यात आले.

निवेदनात शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, एमएसपी कायदा लागू करावा, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश असताना बँकांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची काढलेली प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तत्काळ जमा करावी. कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, प्रलंबित असलेले शेतातील वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे. तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीमध्ये व कोरची नगरपंचायत क्षेत्रामध्ये शंभर दिवस पुरेल एवढी रोजगार हमीची कामे सुरू करावीत. वन हक्क प्राप्त सातबारावर धान्य खरेदी करण्यात यावी. तालुक्यात बीएसएनएलव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेटवर्कची सोय नसल्यामुळे वेळेवर नेटवर्क नसताना ऑनलाइन कामे करणे व इतर कामे करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जिओ किंवा वोडाफोन टॉवर उभारण्यात यावे, तालुक्यातील गाव-पाडे अद्याप महसुली गावे म्हणून घोषित झाली नाहीत. त्यांना वनहक्क कायद्याअंतर्गत महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा, कोरची ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देऊन महिला व बाल रोगतज्ज्ञांची नियुक्ती करावी. ग्रामीण रुग्णालयातच सिझर करण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कोरची शहरातून महाग्रामसभेच्या नारेबाजीने शहर दुमदुमून गेले.

माेर्चात महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैताम, कल्पना नैताम, शीतल नैताम, सियाराम हलामी, इजासाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे, राजेश नैताम, अशोक गावतुरे, मथुरा नैताम व तालुक्यातील संपूर्ण ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव व नागरिक सहभागी झाले हाेते.

बाॅक्स

१३३ गावांसाठी केवळ एक राष्ट्रीयीकृत बँक

काेरची तालुक्यात १३३ गावे असून बँक ऑफ इंडियाची एकच शाखा आहे. त्यामुळे बँकेकडे तालुक्यातील फक्त ३६ गावांतील लोकांना बँक कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे तालुका मुख्यालयात भारतीय स्टेट बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांना रोजगार हमी कायद्यांतर्गत शेती समाविष्ट बियाणे, खते, नांगरणी, रोवणी, धान कापणी, मळणी इत्यादी कामात रोजगार हमी योजनेमधून मजुरी देण्यात यावी, १३ डिसेंबर २००५ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना वन हक्क कायद्यांतर्गत तातडीने पट्टे देऊन सिंचनाची सोय करून द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीवर विहीर योजनाऐवजी बोरवेलची व्यवस्था करावी व सौरऊर्जेवर चालणारी स्ट्राेक बॅटरी कनेक्शन द्यावे, अशी मागणीही महाग्रामसभेने निवेदनातून केली.