शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

महाग्रामसभेची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण ...

कोरची : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी व अन्य मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी बुधवार, १० फेब्रुवारीला दुपारी १ वाजता गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदार सी. आर. भंडारी यांना देण्यात आले.

निवेदनात शेतकऱ्यांना विश्‍वासात न घेता केंद्र सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत, एमएसपी कायदा लागू करावा, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, पीक कर्ज पुनर्गठन करण्याचे आदेश असताना बँकांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करण्यात यावी, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांची काढलेली प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम तत्काळ जमा करावी. कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, प्रलंबित असलेले शेतातील वीज कनेक्शन तातडीने जोडून देण्यात यावे. तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीमध्ये व कोरची नगरपंचायत क्षेत्रामध्ये शंभर दिवस पुरेल एवढी रोजगार हमीची कामे सुरू करावीत. वन हक्क प्राप्त सातबारावर धान्य खरेदी करण्यात यावी. तालुक्यात बीएसएनएलव्यतिरिक्त इतर कुठल्याही नेटवर्कची सोय नसल्यामुळे वेळेवर नेटवर्क नसताना ऑनलाइन कामे करणे व इतर कामे करण्यास अडचणी येतात. त्यामुळे जिओ किंवा वोडाफोन टॉवर उभारण्यात यावे, तालुक्यातील गाव-पाडे अद्याप महसुली गावे म्हणून घोषित झाली नाहीत. त्यांना वनहक्क कायद्याअंतर्गत महसुली गावाचा दर्जा देण्यात यावा, कोरची ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या दर्जा देऊन महिला व बाल रोगतज्ज्ञांची नियुक्ती करावी. ग्रामीण रुग्णालयातच सिझर करण्याची व्यवस्था करावी आदी मागण्यांचा समावेश हाेता. गोटुल भूमी ते तहसील कार्यालयापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. कोरची शहरातून महाग्रामसभेच्या नारेबाजीने शहर दुमदुमून गेले.

माेर्चात महाग्रामसभेचे अध्यक्ष झाडूराम हलामी, सचिव नरेंद्र सलामे, सहसचिव कुमारी जमकातन, राजाराम नैताम, कल्पना नैताम, शीतल नैताम, सियाराम हलामी, इजासाय काटेंगे, नंदकिशोर वैरागडे, रूपेश कुमरे, गणेश गावडे, राजेश नैताम, अशोक गावतुरे, मथुरा नैताम व तालुक्यातील संपूर्ण ग्रामसभेचे अध्यक्ष सचिव व नागरिक सहभागी झाले हाेते.

बाॅक्स

१३३ गावांसाठी केवळ एक राष्ट्रीयीकृत बँक

काेरची तालुक्यात १३३ गावे असून बँक ऑफ इंडियाची एकच शाखा आहे. त्यामुळे बँकेकडे तालुक्यातील फक्त ३६ गावांतील लोकांना बँक कर्ज मंजूर केले जाते. त्यामुळे तालुका मुख्यालयात भारतीय स्टेट बँकेची नवीन शाखा सुरू करण्यात यावी. शेतकऱ्यांना रोजगार हमी कायद्यांतर्गत शेती समाविष्ट बियाणे, खते, नांगरणी, रोवणी, धान कापणी, मळणी इत्यादी कामात रोजगार हमी योजनेमधून मजुरी देण्यात यावी, १३ डिसेंबर २००५ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांना वन हक्क कायद्यांतर्गत तातडीने पट्टे देऊन सिंचनाची सोय करून द्यावी, शेतकऱ्यांच्या शेतीवर विहीर योजनाऐवजी बोरवेलची व्यवस्था करावी व सौरऊर्जेवर चालणारी स्ट्राेक बॅटरी कनेक्शन द्यावे, अशी मागणीही महाग्रामसभेने निवेदनातून केली.