शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

किटाळीत मजुरांची उपासमार पाण्यासाठीही हाहाकार

By admin | Updated: March 7, 2016 01:06 IST

आरमोरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीने मागील दीड महिन्यांपासून रोहयो काम उपलब्ध करून दिले नाही.

नळ योजना बंद : ७२९ मजुरांनी केली आहे कामाची मागणीजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीने मागील दीड महिन्यांपासून रोहयो काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे रोहयो मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे तर दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असतानाही दोन महिन्यांपासून येथील नळ योजना बंद पडली आहे. परिणामी महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. किटाळी गटग्रामपंचायत अंतर्गत एकूण १ हजार २३३ रोहयो मजूर असून त्यापैकी ७२९ मजुरांनी कामाची मागणी केली आहे. मजुरांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने दोन पांदन रस्त्यांची कामे ७ जानेवारी रोजी हाती घेतली. ही कामे दोनच हप्ते करून मंडई असल्याचे कारण पुढे करून काम बंद केले. दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सदर काम सुरू करण्यात आले नाही. यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे शेतमजुरांसह शेतकरीवर्गही कामाची मागणी करीत आहे. ग्रामपंचायतीकडे रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित असतानाही सदर कामे सुरू करण्यात आले नाही. काम उपलब्ध करून देण्याबाबत रोहयो मजुरांनी अनेकवेळा कामाची मागणी केली आहे. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. मागणी करताच रोहयो काम उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहेत. मात्र निष्क्रीय ग्रामपंचायत प्रशासनामुळे रोहयो काम मिळण्यास अडचण होत आहे. किटाळी येथील नळ योजना दोन महिन्यांपासून बंद आहे. येथील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. येथील नळ योजनेची मोटार जळाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या खात्यामधून दहा हजार रूपये काढून दुरूस्त करण्यात आली. मात्र पुन्हा काही दिवसातच मोटार बंद पडली. दोन महिन्यांपासून नळ योजना बंदस्थितीत आहे. नळ योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)आंदोलनाचा इशाराकिटाळी येथील दुष्काळ सदृष्य परिस्थिती असतानाही प्रशासनाने काम उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे रोहयो मजूर संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे केवळ किरकोळ दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीने लाखो रूपयांची नळ योजना बंद पाडली आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. आताच महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे रोहयो मजूर व महिला मिळून आंदोलन छेडणार आहेत, असा इशारा पोलीस पाटील वामन बांबोळे, नीलकंठ मंगर, नवनाथ सयाम, लोमेश्वर देशमुख, कवडू देशमुख, ऋषी मंगरे, रेवनाथ बोरकुटे यांनी दिला आहे.