शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

किटाळीत मजुरांची उपासमार पाण्यासाठीही हाहाकार

By admin | Updated: March 7, 2016 01:06 IST

आरमोरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीने मागील दीड महिन्यांपासून रोहयो काम उपलब्ध करून दिले नाही.

नळ योजना बंद : ७२९ मजुरांनी केली आहे कामाची मागणीजोगीसाखरा : आरमोरी तालुक्यातील किटाळी ग्रामपंचायतीने मागील दीड महिन्यांपासून रोहयो काम उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे रोहयो मजुरांवर आर्थिक संकट कोसळले आहे तर दुसरीकडे उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असतानाही दोन महिन्यांपासून येथील नळ योजना बंद पडली आहे. परिणामी महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. किटाळी गटग्रामपंचायत अंतर्गत एकूण १ हजार २३३ रोहयो मजूर असून त्यापैकी ७२९ मजुरांनी कामाची मागणी केली आहे. मजुरांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीने दोन पांदन रस्त्यांची कामे ७ जानेवारी रोजी हाती घेतली. ही कामे दोनच हप्ते करून मंडई असल्याचे कारण पुढे करून काम बंद केले. दीड महिन्यांचा कालावधी उलटूनही सदर काम सुरू करण्यात आले नाही. यावर्षी पावसाने दगा दिल्याने धानाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे शेतमजुरांसह शेतकरीवर्गही कामाची मागणी करीत आहे. ग्रामपंचायतीकडे रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित असतानाही सदर कामे सुरू करण्यात आले नाही. काम उपलब्ध करून देण्याबाबत रोहयो मजुरांनी अनेकवेळा कामाची मागणी केली आहे. मात्र कामाला सुरुवात झाली नाही. मागणी करताच रोहयो काम उपलब्ध करून देण्याचे निर्देश शासनाकडून दिले आहेत. मात्र निष्क्रीय ग्रामपंचायत प्रशासनामुळे रोहयो काम मिळण्यास अडचण होत आहे. किटाळी येथील नळ योजना दोन महिन्यांपासून बंद आहे. येथील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. येथील नळ योजनेची मोटार जळाल्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या खात्यामधून दहा हजार रूपये काढून दुरूस्त करण्यात आली. मात्र पुन्हा काही दिवसातच मोटार बंद पडली. दोन महिन्यांपासून नळ योजना बंदस्थितीत आहे. नळ योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)आंदोलनाचा इशाराकिटाळी येथील दुष्काळ सदृष्य परिस्थिती असतानाही प्रशासनाने काम उपलब्ध करून दिलेले नाही. त्यामुळे रोहयो मजूर संतप्त झाले आहेत. तर दुसरीकडे केवळ किरकोळ दुरूस्तीसाठी ग्रामपंचायतीने लाखो रूपयांची नळ योजना बंद पाडली आहे. उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. भर उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. आताच महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे रोहयो मजूर व महिला मिळून आंदोलन छेडणार आहेत, असा इशारा पोलीस पाटील वामन बांबोळे, नीलकंठ मंगर, नवनाथ सयाम, लोमेश्वर देशमुख, कवडू देशमुख, ऋषी मंगरे, रेवनाथ बोरकुटे यांनी दिला आहे.