शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; चामोर्शी तालुक्याचा कौल कोणाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 00:06 IST

गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक मतदारांचा तालुका : आंबेडकरांच्या सभेनंतर वाढणार रंगत

रत्नाकर बोमीडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात चामोर्शी तालुक्याला विशेष महत्व आहे. या तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १ लाख ३४ हजार ९०५ मतदार असून यामध्ये ६९ हजार ७०३ पुरूष व ६५ हजार २०२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. अहेरी व आरमोरी या दोन्ही विधानसभा मतदार संघाला जोडणारा तालुका असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराचा जोर चामोर्शी तालुक्यातील मतदारांवर असतो.निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजप व काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची मोठी चढाओढ सुरू होती त्याचेही केंद्र चामोर्शी तालुक्यातच होते. अखेरीस काँग्रेसची उमेदवारी मिळविण्यात याच तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले डॉ.नामदेव उसेंडी यशस्वी झाले. त्यामुळे विद्यमान खासदार नेते आणि डॉ.उसेंडी अशी सरळ लढत असली तरी गेल्यावेळी याच दोघांच्या फाईमध्ये तिसऱ्या स्थानी राहिलेले डॉ.रमेशकुमार गजबे यांनी ५० हजारावर मते घेतली होती. यावेळी पुन्हा ते वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात उतरले आहेत.दोन्ही प्रमुख पक्षातील गटबाजी केव्हा, कशी उफाळून येईल, हे सांगता येत नाही. भाजपाच्या प्रचारासाठी केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसच्या प्रचारासाठी महाराष्टÑाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण चामोर्शीत येत आहेत. त्यांच्या सभेनंतर भाजप-काँग्रेस उमेदवारांची स्थिती बऱ्यापैकी स्पष्ट होईल. परंतु मागील निवडणुकीत तिसºया स्थानी राहिलेले चिमूरचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे यांना रिंगणात उतरविणारे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर २ एप्रिल रोजी चामोर्शी येथे सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेनंतर निवडणुकीचा माहोल कसा बदलतो याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे. वंचित व बहुजनांना सोबत घेण्यात ते यशस्वी झाले तर दुहेरी होत असलेली निवडणूक या तालुक्यात तरी तिहेरी झाल्याशिवाय राहणार नाही.११ जि.प. क्षेत्र व एक नगर पंचायत असलेला चामोर्शी तालुका भाजपामय झाला असला तरी कार्यकर्त्यांच्या विभाजनामुळे पोखरला गेला आहे. त्याचा फायदा काँग्रेस कसा घेते यावरच काँग्रेसचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसमध्ये अंतस्त गटबाजी आहे, याची चुणूक न.पं. निवडणुकीत दिसून आली. तसेच उमेदवारी मिळवितानाही डॉ. नामदेव उसेंडींना त्रास गेलाच. दोन्ही पक्षातील गटबाजीचा लाभ घेऊन वंचित बहुजनांना एकत्रित करण्यात डॉ.गजबे यशस्वी झाले आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची जादूची झप्पी लागू पडली तर डॉ.गजबे देखील रणांगणात येऊन तिरंगी लढतीचे चित्र निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काँग्रेस ते भाजप प्रवासचामोर्शी तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राजकारणात शिवसेनेच्या प्रवेशानंतर शिवसेनेने आपला दबदबा निर्माण केला. नंतर अशोक नेते यांच्या राजकीय प्रवेशानंतर हा तालुका भाजपाच्या ताब्यात केव्हा व कसा गेला हे कोणालाच कळले नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक