शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन
3
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
4
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
5
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
6
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
7
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
8
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
9
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
10
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
11
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
12
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
13
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
14
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
15
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
16
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
17
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
18
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
19
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
20
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:40 IST

काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील राजे विश्वेश्वर महाराज स्टेडियममध्ये भाजपा व मित्र पक्षाच्या विजय संकल्प रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, सभापती सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, शिवसेनेचे राजगोपाल सुलवावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतून निघालेला १ रुपयातले १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचत होते. आता जनधन योजनेद्वारे १०० टक्के पैसा लोकांच्या हातात मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहेत. धुरमुक्त स्वयंपाकासाठी घराघरात गॅस पोहोचला आहे. या पाच वर्षात देशात सर्वच ठिकाणी वीज पोहचली असून २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळाले असेल, असे त्यांनी सांगितले.देशात १३ कोटी लोकांना मुद्रा लोणद्वारे रोजगार निर्मितीसाठी मदत झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे दररोज जवळपास ५० कोटी लोकांना आरोग्यासाठी मदत होते. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना विम्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, गवंडी, घरकाम, महिला व इतर लोकांना पेन्शनची योजना येणाऱ्या काळात करणार आहे.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी ४.४३ वाजता अहेरीत पोहचले व ५.१५ वाजता नागपूरकडे उडाले. या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली होती.१ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूरगडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने आदिवासी विकासासाठी ९ टक्के निधी राखीव करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. १ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. गैरआदिवासींचे वनहक्क दावे सुध्दा लवकरच मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. गोंडी भाषेला देशाच्या भाषा सूचित आणण्यासाठीसुद्धा पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर