शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:40 IST

काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील राजे विश्वेश्वर महाराज स्टेडियममध्ये भाजपा व मित्र पक्षाच्या विजय संकल्प रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, सभापती सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, शिवसेनेचे राजगोपाल सुलवावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतून निघालेला १ रुपयातले १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचत होते. आता जनधन योजनेद्वारे १०० टक्के पैसा लोकांच्या हातात मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहेत. धुरमुक्त स्वयंपाकासाठी घराघरात गॅस पोहोचला आहे. या पाच वर्षात देशात सर्वच ठिकाणी वीज पोहचली असून २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळाले असेल, असे त्यांनी सांगितले.देशात १३ कोटी लोकांना मुद्रा लोणद्वारे रोजगार निर्मितीसाठी मदत झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे दररोज जवळपास ५० कोटी लोकांना आरोग्यासाठी मदत होते. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना विम्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, गवंडी, घरकाम, महिला व इतर लोकांना पेन्शनची योजना येणाऱ्या काळात करणार आहे.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी ४.४३ वाजता अहेरीत पोहचले व ५.१५ वाजता नागपूरकडे उडाले. या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली होती.१ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूरगडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने आदिवासी विकासासाठी ९ टक्के निधी राखीव करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. १ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. गैरआदिवासींचे वनहक्क दावे सुध्दा लवकरच मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. गोंडी भाषेला देशाच्या भाषा सूचित आणण्यासाठीसुद्धा पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर