शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; ही निवडणूक देशाच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची मतदारांना साद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:40 IST

काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : काँग्रेसने देशद्रोहासारख्या कलमाला हटविणार असल्याचे सांगितले. यातून देशाच्या सुरक्षिततेच्या अधिकारावर घाला घालण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे ही निवडणूक देशाच्या सुरिक्षततेसाठी महत्वाची आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला पुन्हा आपला कौल द्या, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.येथील राजे विश्वेश्वर महाराज स्टेडियममध्ये भाजपा व मित्र पक्षाच्या विजय संकल्प रॅलीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, लोकसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी, आ.रामदास आंबटकर, जि.प. अध्यक्ष योगिता भांडेकर, सभापती सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष हर्षा ठाकरे, बाबुराव कोहळे, प्रकाश गेडाम, शिवसेनेचे राजगोपाल सुलवावर आदी पदाधिकारी उपस्थित होते.आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती देऊन गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या उपाययोजनाही सांगितल्या.मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतून निघालेला १ रुपयातले १५ पैसे लोकांपर्यंत पोहोचत होते. आता जनधन योजनेद्वारे १०० टक्के पैसा लोकांच्या हातात मिळत आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहेत. धुरमुक्त स्वयंपाकासाठी घराघरात गॅस पोहोचला आहे. या पाच वर्षात देशात सर्वच ठिकाणी वीज पोहचली असून २०२२ पर्यंत प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळाले असेल, असे त्यांनी सांगितले.देशात १३ कोटी लोकांना मुद्रा लोणद्वारे रोजगार निर्मितीसाठी मदत झाली आहे. आयुष्यमान भारत योजनेद्वारे दररोज जवळपास ५० कोटी लोकांना आरोग्यासाठी मदत होते. प्रधानमंत्री किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना विम्यासोबतच शेतकरी, शेतमजूर, गवंडी, घरकाम, महिला व इतर लोकांना पेन्शनची योजना येणाऱ्या काळात करणार आहे.मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी ४.४३ वाजता अहेरीत पोहचले व ५.१५ वाजता नागपूरकडे उडाले. या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस कुमकही मागवण्यात आली होती.१ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूरगडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंदे सुरू करून जिल्ह्यातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारने आदिवासी विकासासाठी ९ टक्के निधी राखीव करून विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. १ लाख ७७ हजार वनहक्क दावे मंजूर करण्यात आले आहेत. गैरआदिवासींचे वनहक्क दावे सुध्दा लवकरच मार्गी लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश दिला. ज्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होत आहे. गोंडी भाषेला देशाच्या भाषा सूचित आणण्यासाठीसुद्धा पक्षातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019gadchiroli-chimur-pcगडचिरोली-चिमूर