शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे रस्ते अपघातात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:38 IST

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन एकेका दिवशी अनेक लोकांचा जीव जात होता. तर ...

कोरोनाचे संकट येण्यापूर्वी रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होऊन एकेका दिवशी अनेक लोकांचा जीव जात होता. तर अनेक जण गंभीर जखमी होऊन हातपाय गमावून बसले. कित्येक जणांना रस्ता अपघातात अपंगत्व आले. दिवसेंदिवस खेड्यांपासून शहराच्या लोकसंख्येत भरमसाठ वाढ होत आहे. या वाढत्या लोकसंख्येनुसार लोकांच्या गरजाही वाढत असल्याने दुचाकी, चारचाकी व मोठ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दिवस-रात्र वाहनांची रस्त्याने सतत ये-जा सुरू राहायची. वाहतुकीसाठी रस्तेही अपुरे पडायला लागले होते. अरुंद रस्ते आणि ये-जा करणारे वाहन जास्त यामुळे दररोज अनेक रस्त्यांवर लहान-मोठ्या वाहनांना अपघात घडून यामध्ये अनेक जण गंभीर जखमी तर कित्येक जण मृत्युमुखी पडत होते.

मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आहे. त्याचा संसर्ग मोठ्या महानगरापासून तर खेड्यापाड्यांपर्यंत पोहाेचला. या महामारीपासून स्वतःला आणि कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्वजण धडपड करीत आहेत. कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन व संचारबंदी केली. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलीस तैनात करण्यात येऊन सीमा लॉक करण्यात आल्या. शासन-प्रशासनाने जारी केलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यामुळे लोकांचे घराबाहेर निघणे, विनाकामाने वाहनाने फिरणे बंद झाले. नेहमीच वाहनांच्या कर्कश आवाजाने गजबजणारे रस्ते मोकळे झाले. त्यानंतर कोरोनाची पुन्हा दुसरी लाट आली आणि शासनाने पुन्हा दुसऱ्यांदा लाॅकडाऊन व संचारबंदी लागू केली. तसेच त्याची कठोर अंमलबजावणी सुरू करून ठिकठिकाणी पोलिसांद्वारे नाकाबंदी केल्यामुळे वाहन घेऊन घराबाहेर फिरणाऱ्यांना मोठा चाप बसला. त्यातच कोरोनाची भीती निर्माण झाल्याने व दुसरी लाट प्रभावी असल्याने लोकांचे रस्त्याने फिरणे बंद झाले. परिणामी रस्ते अपघाताचे प्रमाण घटले. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात शासन-प्रशासनाने दोनदा संचारबंदी व लाॅकडाऊन केल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात घट झाली असून शेकडो लोकांचा जीव वाचला.

बाॅक्स

पेट्रोल-डिझेल खर्चातही बचत

कोरोनामुळे संचारबंदी व लाॅकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अनावश्यक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर होणारी गर्दी कमी झाली. दुचाकी व चारचाकी वाहनाने विनाकारण फिरणे बंद झाल्याने अनेकांची वाहने घरीच पडून आहेत. आधीच पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्याने दररोज पेट्रोल व डिझेलवर होणारा खर्च थांबला. परिणामी पैशांची अनावश्यक उधळपट्टी थांबून खर्चात मोठी बचत झाली.