शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

पावसामुळे रोवलेल्या धानाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:31 IST

१५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.

ठळक मुद्देशुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाची हजेरी : पुरेशा पाण्याअभावी मात्र रोवणीची कामे खोळंबलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १५ दिवसांच्या उसंतीनंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. यामुळे रोवलेल्या धान पिकाला दिलासा मिळाला आहे. मात्र रोवणीची कामे सुरू होण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे.जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात अगदी वेळेवर व समाधानकारक पाऊस पडत होता. त्यामुळे रोवणीची कामे वेळेवर सुरूवात झाली. त्यानंतर मात्र पावसाने जवळपास १५ ते २० दिवस उसंत घेतली. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांध्यांमधील पाणी आटले. त्यामुळे रोवणीची कामे बंद पडली. त्याचबरोबर रोवलेल्या धानाच्या बांधितही पाण्याअभावी फटी पडू लागल्या व धानाचे पीक करपायला लागले होते. त्यामुळे शेतकºयांची चिंता वाढली होती. यावर्षी सुध्दा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा शक्यता वर्तविली जात होती. मात्र शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. शनिवारी दिवसभर पाऊस पडत होता. या पावसामुळे करपणाºया धान पिकाला दिलासा मिळाला आहे.पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनपर्यंत खोळंबलेली रोवणीची कामे मात्र सुरू झाली नाही. रोवणी पुन्हा सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. धान पिकाची रोवणी जेवढी उशीरा होते, तेवढी उत्पादनात घट होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा संपण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजुनही जवळपास ३० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.४० हजार हेक्टर क्षेत्र रोवणीविनापावसाने उसंत घेतल्याने जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रावर अजुनही धान पिकाची रोवणी झाली नाही. हे शेतकरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. शनिवारी दिवसभर पावसाची रिपझीप सुरू होती. मात्र अशा पावसामुळे धानाच्या बांधीत रोवण्यायोग्य पाणी साचत नाही. रोवणे सुरू होण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. धानाचे पºहे टाकल्याला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी उलटला आहे. उशीरा रोवणी झाल्याने उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे.पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यात एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती