शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:55 IST

खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर पावसाची हजेरी : शेतकºयांचा जीव भांड्यात, मात्र आणखी पावसाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्हाभरात सरासरी १५ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे.गेल्या २४ तासात सर्वाधिक ६०.८ मिमी पाऊस कोरची तालुक्यात झाला आहे. कुरखेडा, आरमोरी, धानोरा, देसाईगंज या तालुक्यात २० ते २५ मिमीदरम्यान पाऊस झाला. सिरोंचात बुधवारी सकाळपर्यंत पाऊस नसला तरी दोन दिवसांपूर्वी या भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. आरमोरी, कोरची आणि कोटगुल या मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैलोचना नदीला पूर आल्याने एक मार्ग बंद झाला आहे. मात्र इतर कुठेही नुकसान किंवा मार्ग बंद होण्याच्या घटना नाहीत.यावर्षीचा आतापर्यंतचा पाऊस ९६०.३ मिमी असला तरी तो या तारखेपर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या तुलनेत ७४.९ टक्केच आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत सरासरीच्या तुलनेत १०७.८ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.सध्या हलक्या धानाचे पीक निसवण्याच्या स्थितीत आहे तर काही निसवले आहे. मध्यम धान गर्भावस्थेत तर जड धानाला आणखी काही कालावधी लागणार आहे. सर्व धानाला आणखी ३ ते ४ वेळा पाणी मिळण्याची गरज आहे. पाऊस योग्य वेळी आल्यास धानाला धोका राहणार नाही. मात्र यानंतर पावसाने धोका दिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. सदर पावसाने धानपीकावर आलेला रोग काही प्रमाणात नाहीसा झाला आहे.धानोरा तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने येरकड-मालेवाडा मार्गावरील इरूपढोडरी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच इरूपढोडरी-सायगाव-मुस्का मार्गावरील तळेगाव नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. धानोरा तालुक्यात ४० मिमी पाऊस झाल्याची नोंद झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली असून धानोराचे बीडीओ टिचकुले यांनी येरकड-मालेवाडा मार्गावर येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.खतासाठी वडसा रेल्वे स्थानकात रॅक पॉईटवडसा रेल्वे स्थानकाच्या कामामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला तेथील रॅक पॉईंट खासदार अशोक नेते, कृषी सभापती नाना नाकाडे यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे. दोन दिवसात वडसा स्थानकात खताची रॅक येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना लागणाºया युरिया खताची गरज भागविण्यासाठी गोंदिया-चंद्रपूर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. खरीब हंगामाची सोय इकडून-तिकडून केली असली तरी रबी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वडसाच्या रॅक पाईंटवरून युरिया उपलब्ध करणे सोपे जाईल, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी एस.डी.पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वैरागड-मानापूर मार्ग बंदवैरागड : मंगळवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही आपला वेग कायम ठेवला. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी तुडूंब भरून पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बुधवारी सकाळपासूनच पूर्णत: बंद झाला आहे. मंगळवारच्या रात्रीपासून दमदार पाऊस होत असल्याने वैरागड भागातील धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. अल्पमुदतीच्या धानपिकांना या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. यापूर्वी आटोपलेल्या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे पाण्यासाठी शेतकºयांची बरीच तारांबळ उडाली होती. मिळेल त्या साधनांनी शेतकरी आपल्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करीत होते. जलसाठे कोरडे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. दरम्यान मंगळवारपासून सुरू झालेल्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दमदार पावसाने शेतकरी आनंदी झाला आहे. २० व २१ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेष म्हणजे कमी मुदतीच्या धानपिकाला केवळ एका पावसाची आवश्यकता होती, त्यामुळे हा पाऊस या धानपिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. पावसामुळे जलसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वैरागड भागात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने वैलोचना नदीच्या पुलावर पाणी होते. परिणामी मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प झाली होती.