शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

खरीप पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:55 IST

खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाभर पावसाची हजेरी : शेतकºयांचा जीव भांड्यात, मात्र आणखी पावसाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामातील पीक ऐन भरीस असताना पावसाने पाठ फिरविल्याने चिंताग्रस्त झालेल्या शेतकºयांना सलग दोन दिवसाच्या पावसाने बराच दिलासा मिळाला आहे. बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार २४ तासात जिल्हाभरात सरासरी १५ मिमी पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे पीकांना जीवदान मिळाले आहे.गेल्या २४ तासात सर्वाधिक ६०.८ मिमी पाऊस कोरची तालुक्यात झाला आहे. कुरखेडा, आरमोरी, धानोरा, देसाईगंज या तालुक्यात २० ते २५ मिमीदरम्यान पाऊस झाला. सिरोंचात बुधवारी सकाळपर्यंत पाऊस नसला तरी दोन दिवसांपूर्वी या भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांची स्थिती चांगली आहे. आरमोरी, कोरची आणि कोटगुल या मंडळांमध्ये अतिवृष्टीचीही नोंद झाली आहे. आरमोरी तालुक्यातील वैलोचना नदीला पूर आल्याने एक मार्ग बंद झाला आहे. मात्र इतर कुठेही नुकसान किंवा मार्ग बंद होण्याच्या घटना नाहीत.यावर्षीचा आतापर्यंतचा पाऊस ९६०.३ मिमी असला तरी तो या तारखेपर्यंत पडणाºया सरासरी पावसाच्या तुलनेत ७४.९ टक्केच आहे. गेल्यावर्षी या तारखेपर्यंत सरासरीच्या तुलनेत १०७.८ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे.सध्या हलक्या धानाचे पीक निसवण्याच्या स्थितीत आहे तर काही निसवले आहे. मध्यम धान गर्भावस्थेत तर जड धानाला आणखी काही कालावधी लागणार आहे. सर्व धानाला आणखी ३ ते ४ वेळा पाणी मिळण्याची गरज आहे. पाऊस योग्य वेळी आल्यास धानाला धोका राहणार नाही. मात्र यानंतर पावसाने धोका दिल्यास उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. सदर पावसाने धानपीकावर आलेला रोग काही प्रमाणात नाहीसा झाला आहे.धानोरा तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्याने येरकड-मालेवाडा मार्गावरील इरूपढोडरी नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. तसेच इरूपढोडरी-सायगाव-मुस्का मार्गावरील तळेगाव नजीकच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. धानोरा तालुक्यात ४० मिमी पाऊस झाल्याची नोंद झाल्याची नोंद प्रशासनाने घेतली असून धानोराचे बीडीओ टिचकुले यांनी येरकड-मालेवाडा मार्गावर येऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.खतासाठी वडसा रेल्वे स्थानकात रॅक पॉईटवडसा रेल्वे स्थानकाच्या कामामुळे दोन वर्षांपासून बंद असलेला तेथील रॅक पॉईंट खासदार अशोक नेते, कृषी सभापती नाना नाकाडे यांच्या पुढाकाराने सुरू झाला आहे. दोन दिवसात वडसा स्थानकात खताची रॅक येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना लागणाºया युरिया खताची गरज भागविण्यासाठी गोंदिया-चंद्रपूर जिल्ह्यांवर अवलंबून राहावे लागणार नाही. खरीब हंगामाची सोय इकडून-तिकडून केली असली तरी रबी हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी वडसाच्या रॅक पाईंटवरून युरिया उपलब्ध करणे सोपे जाईल, अशी माहिती जि.प.चे कृषी विकास अधिकारी एस.डी.पठाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.वैरागड-मानापूर मार्ग बंदवैरागड : मंगळवारच्या रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने बुधवारीही आपला वेग कायम ठेवला. त्यामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलोचना नदी तुडूंब भरून पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बुधवारी सकाळपासूनच पूर्णत: बंद झाला आहे. मंगळवारच्या रात्रीपासून दमदार पाऊस होत असल्याने वैरागड भागातील धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. अल्पमुदतीच्या धानपिकांना या पावसाचा चांगला फायदा झाला आहे. यापूर्वी आटोपलेल्या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. त्यामुळे पाण्यासाठी शेतकºयांची बरीच तारांबळ उडाली होती. मिळेल त्या साधनांनी शेतकरी आपल्या शेतजमिनीला पाणी पुरवठा करीत होते. जलसाठे कोरडे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. दरम्यान मंगळवारपासून सुरू झालेल्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या दमदार पावसाने शेतकरी आनंदी झाला आहे. २० व २१ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेष म्हणजे कमी मुदतीच्या धानपिकाला केवळ एका पावसाची आवश्यकता होती, त्यामुळे हा पाऊस या धानपिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला. पावसामुळे जलसाठ्यात सुद्धा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी वैरागड भागात दोन दिवस दमदार पाऊस झाल्याने वैलोचना नदीच्या पुलावर पाणी होते. परिणामी मार्ग बंद होऊन वाहतूक ठप्प झाली होती.