आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! 30 वर्षांत लिटरमागे 90 रुपयांची वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 05:00 AM2021-05-14T05:00:00+5:302021-05-14T05:00:29+5:30

१९९१ मध्ये गडचिराेलीत पेट्राेलचा दर केवळ १५ रुपये लिटर हाेता. २००१ मध्ये २९ रुपये प्रतिलिटर, २०११ मध्ये ७३ रुपये प्रतिलिटर हाेता, तर आता हा दर ९९ रुपयांवर पाेहाेचला असून, दाेन ते चार दिवसांत तो शंभरी गाठणार आहे. संचारबंदीमुळे पेट्राेलचा वापर जवळपास निम्म्यावर आला आहे. मागणी कमी झाल्याने दर वाढणे हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. मात्र, पेट्राेलच्या बाबतीत हा नियम लागू हाेत नाही काय?

Life ‘lac’; Petrol price hike 'unlocked'! 90 per liter increase in 30 years! | आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! 30 वर्षांत लिटरमागे 90 रुपयांची वाढ!

आयुष्य ‘लाॅक’; पेट्राेल दरवाढ ‘अनलाॅक’! 30 वर्षांत लिटरमागे 90 रुपयांची वाढ!

Next
ठळक मुद्देशंभरीच्या जवळ पाेहाेचले पेट्राेलचे दर, वाहन वापरणे झाले कठीण

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : संचारबंदीमुळे राज्यभरातील नागरिकांचे जीवन घरात लाॅक झाले आहे. त्यामुळे पेट्राेलचा वापर कमी झाला आहे. मात्र, पेट्राेलची दरवाढ कायम असून, गडचिराेलीत १३ मे राेजी पेट्राेलचा दर ९९.०४ रुपये हाेता. १९९१ ते २०२१ या कालावधीत पेट्राेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ८४ रुपयांची वाढ झाली आहे.
 बदललेल्या अर्थव्यवस्थेत मानवाचे जीवन गतिमान झाले आहे. त्याला आणखी गतिमान करण्यात वाहनांचा महत्त्वाचा वाटा आहे. वाहन हे अत्यावश्यक गरजेत माेडणारी वस्तू झाली असल्याने वाहनांची संख्या मागील काही वर्षांमध्ये वाढत चालली आहे. त्याचबराेबर पेट्राेल व डिझेलचे दरसुद्धा वाढत आहेत. 
१९९१ मध्ये गडचिराेलीत पेट्राेलचा दर केवळ १५ रुपये लिटर हाेता. २००१ मध्ये २९ रुपये प्रतिलिटर, २०११ मध्ये ७३ रुपये प्रतिलिटर हाेता, तर आता हा दर ९९ रुपयांवर पाेहाेचला असून, दाेन ते चार दिवसांत तो शंभरी गाठणार आहे. 
संचारबंदीमुळे पेट्राेलचा वापर जवळपास निम्म्यावर आला आहे. मागणी कमी झाल्याने दर वाढणे हा अर्थव्यवस्थेचा नियम आहे. मात्र, पेट्राेलच्या बाबतीत हा नियम लागू हाेत नाही काय? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. संचारबंदीच्या कालावधीतही पेट्राेल दरवाढ सुरूच आहे. मागील दहा दिवसांत पेट्राेलच्या दरात तब्बल पाच वेळा वाढ झाली आहे. 

पुन्हा सायकलवर फिरावे लागणार

दर दिवशी हाेणारी पेट्राेल व डिझेलच्या दरातील वाढ आवाक्याबाहेरची आहे. दिवसाची २०० रुपये मजुरी करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला आता दुचाकी परवडणारी नाही. त्यामुळे आता सायकलचा वापर करावा लागणार आहे.
 -गिरीष मेश्राम, बांधकाम मजूर

पेट्राेल व डिझेल हे शासनाने पैसे कमविण्याचे साधन बनविले आहे. निवडणुकीच्या कालावधीत पेट्राेल व डिझेलचे दर वाढविले जात नाहीत. निवडणुका संपताच भाववाढ हाेण्यास सुरुवात हाेते. शासनाची ही चाल असून, जनतेने सावध हाेण्याची गरज आहे.
-पांडुरंग काेसरे, मजूर

वाढत्या महागाईनुसार काेणत्याही वस्तूच्या दरात वाढ हाेणे अपेक्षित आहे. मात्र, पेट्राेल व डिझेलच्या दरात माेठी वाढ हाेत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता वाहन वापरणे कठीण झाले आहे.        -गणेश बावणे, कर्मचारी
 

पेट्राेलच्या दरावर कराचा भार अधिक
पेट्राेल व डिझेलवर संपूर्ण अर्थव्यवस्थेची भिस्त आहे. या दाेन वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाल्यानंतर महागाई वाढण्यास सुरुवात हाेते. त्यामुळे या दाेन वस्तूंवर कमी प्रमाणात कर आकारणी शासनाकडून अपेक्षित आहे. मात्र, शासन यातूनच अधिकाधिक कर गाेळा करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात पेट्राेलचा दर ९२ रुपये हाेता. त्यामध्ये पेट्राेलचा मूळ दर केवळ २९.७ रुपये एवढा हाेता. राज्य शासनाने २६.२ रुपये कर आकारला. केंद्राचा कर ३३ रुपये हाेता, तर ३.६९ रुपये हे  डीलरचे कमिशन हाेते. यावरून पेट्राेल दरवाढीत राज्य व केंद्र शासनाचा हात असल्याचे दिसून येते.

 

Web Title: Life ‘lac’; Petrol price hike 'unlocked'! 90 per liter increase in 30 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.