शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

१०० शेतकऱ्यांनी गिरविले सगुणा पध्दत भात लागवडीचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:55 IST

महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली.

अंमलबजावणी करण्याचे चंद्रशेखर भारसावले यांचे आवाहन : कृषी महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी उपस्थितगडचिरोली : महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय गडचिरोलीच्या वतीने रविवारी येथील माविमच्या प्रांगणात सगुणा पध्दतीने भात लागवड बाबत कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बचत गटातील १०० पुरूष व महिला शेतकऱ्यांसह कृषी महाविद्यालयाचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सगुणा पध्दतीने भात लागवड केल्यास कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन रायगडचे कृषीतज्ज्ञ चंद्रशेखर भारसावले यांनी केले. विशेष अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे होते. विशेष अतिथी म्हणून रायगडचे अनिल निवलकर, राजेश वाणी तर प्रमुख अतिथी म्हणून माविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कांता मिश्रा, अश्विनी जांभुळकर, माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना भारसावले म्हणाले, आपल्याकडची शेती नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होतो. कमी खर्चाची, कमी श्रमाची, कमी नुकसानीची व जास्त उत्पन्न देणारी शेतीची पध्दती म्हणजेच सगुणा पध्दतीने भात लागवड होय. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली वसाके यांनी केले तर आभार चारूदत्त वाढई यांनी मानले. सदर कार्यशाळेला निलेश सांगोले, सचिन नरूले, सतीश प्रधान, विक्रम त्रिपदे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यात दोन हजार एकरात एसआरटी पध्दतीने लागवडमाविमच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी, उपजीविका सल्लागार, तालुका व्यवस्थापक, सहयोगिनी व गावातील प्रेरक महिलांनी आत्मा कार्यालयाच्या सहकार्याने रायगड येथे अभ्यासदौरा केला व तेथून सगुणा पध्दतीने भात लागवडीचे तंत्रज्ञान आत्मसात केले. या पध्दतीने भात लागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून तीन वर्षात २०० गावात १० हजार एकर पर्यंत एसआरटी पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले. पहिल्या टप्प्यात या वर्षात दोन हजार एकरपर्यंत सगुणा पध्दतीने भात लागवड करण्याचे ठरविण्यात आले आहे. या बाबत कृषी विज्ञान केंद्रातर्फे मुल्यांकन करण्यात येणार आहे.