शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

पानाच्या पत्रावळी झाल्या लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:05 IST

सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातही लोण : सार्वजनिक व खासगी भोजनावळीत प्लास्टिक पत्रावळीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे. मात्र या कार्यक्रमात प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचाच वापर केला जात आहे. परिणामी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पानाच्या पत्रावळी लुप्त झाल्या आहेत.पूर्वी विवाह सोहळा म्हटला की, ग्रामीण भागात दीड महिन्यापासून तयारी सुरू व्हायची. सामूहिक भोजनावळीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घराशेजारच्या तसेच संबंधातील लोकांना गावानजीकच्या झुडूपी जंगलात मोह तसेच पळसाचे पान तोडण्यासाठी पाठविले जात होते. मित्र मंडळी तसेच काही आप्तेष्ठ चार ते पाच दिवस सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जंगलात जाऊन पाने तोडायचे. त्यानंतर या पानापासून रात्री भोजनानंतर पत्रावळी बनविण्याची लगबग सुरू व्हायची.पूर्वी ग्रामीण भागात रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत पत्रावळी तयार करण्याचे काम चालत होते. मात्र आता काळाच्या ओघात पत्रावळीसाठी लागणारे पाने तोडणे व त्यापासून पत्रावळी बनविणे हा प्रकार बंद झाला आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमात अत्यल्प प्रमाणात पानापासून पत्रावळी तयार करून त्याचा वापर केला जात आहे. मात्र सामूहिक व भोजनावळीत पानापासून तयार केलेल्या पत्रावळी दिसून येत नाही. शहरी भागात कागद व प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातही या प्रकाराचे लोण पसरले असून याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात लग्न कार्यासाठी जवळचे आप्तेष्ठ एकादिवसापूर्वी संबंधित कार्यक्रम आयोजकांच्या घरी पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच आधुनिकीकरणाचा परिणाम झाला आहे.ग्रामीण भागातही स्वागत समारंभाचे फॅडपूर्वी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्नकार्य उरकल्यावर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभासारखा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात नव्हता. लग्नाच्या पूर्वी हळद लावणे व शालमुंदीचा कार्यक्रम उत्साहात केला जात होता. मात्र आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातीलही वराकडील मंडळी स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करीत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास चालणारे धार्मिक कार्यक्रमही आता फार कमी झाले आहेत. काळानुसार कार्यक्रमातही बदल घडून येत आहे.