शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

पानाच्या पत्रावळी झाल्या लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:05 IST

सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातही लोण : सार्वजनिक व खासगी भोजनावळीत प्लास्टिक पत्रावळीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागात लग्न समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. शिवाय काही गावांमध्ये धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाचा शेवट सार्वजनिक सामूहिक भोजनाने केला जात आहे. मात्र या कार्यक्रमात प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचाच वापर केला जात आहे. परिणामी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पानाच्या पत्रावळी लुप्त झाल्या आहेत.पूर्वी विवाह सोहळा म्हटला की, ग्रामीण भागात दीड महिन्यापासून तयारी सुरू व्हायची. सामूहिक भोजनावळीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घराशेजारच्या तसेच संबंधातील लोकांना गावानजीकच्या झुडूपी जंगलात मोह तसेच पळसाचे पान तोडण्यासाठी पाठविले जात होते. मित्र मंडळी तसेच काही आप्तेष्ठ चार ते पाच दिवस सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत जंगलात जाऊन पाने तोडायचे. त्यानंतर या पानापासून रात्री भोजनानंतर पत्रावळी बनविण्याची लगबग सुरू व्हायची.पूर्वी ग्रामीण भागात रात्री ११ ते १२ वाजेपर्यंत पत्रावळी तयार करण्याचे काम चालत होते. मात्र आता काळाच्या ओघात पत्रावळीसाठी लागणारे पाने तोडणे व त्यापासून पत्रावळी बनविणे हा प्रकार बंद झाला आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमात अत्यल्प प्रमाणात पानापासून पत्रावळी तयार करून त्याचा वापर केला जात आहे. मात्र सामूहिक व भोजनावळीत पानापासून तयार केलेल्या पत्रावळी दिसून येत नाही. शहरी भागात कागद व प्लास्टिकपासून तयार झालेल्या पत्रावळीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ग्रामीण भागातही या प्रकाराचे लोण पसरले असून याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात लग्न कार्यासाठी जवळचे आप्तेष्ठ एकादिवसापूर्वी संबंधित कार्यक्रम आयोजकांच्या घरी पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच आधुनिकीकरणाचा परिणाम झाला आहे.ग्रामीण भागातही स्वागत समारंभाचे फॅडपूर्वी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लग्नकार्य उरकल्यावर दुसऱ्या दिवशी स्वागत समारंभासारखा मोठा कार्यक्रम आयोजित केला जात नव्हता. लग्नाच्या पूर्वी हळद लावणे व शालमुंदीचा कार्यक्रम उत्साहात केला जात होता. मात्र आता शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातीलही वराकडील मंडळी स्वागत समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करीत आहेत. पूर्वी ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास चालणारे धार्मिक कार्यक्रमही आता फार कमी झाले आहेत. काळानुसार कार्यक्रमातही बदल घडून येत आहे.