शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

अंतर्गत विरोधकांमुळे बसू शकतो नेतेंना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:26 IST

कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देलढाई सोपी नाही : गटबाजी ठरणार डोकेदुखी, मोदी लाटेचा प्रभावही ओसरला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा येथील शिवकृपा नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्जवाटप आणि वसुलीतील दुर्लक्षामुळे निर्माण झालेली स्थिती भाजपाचे उमेदवार नेतेंसाठी अडचणीची ठरणार आहे. या पतसंस्थेचे ते अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी तेथील ठेवीदारांच्या असंतोषाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत घेण्यासाठी गर्दी केली होती. ते प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न झाला असला तरी विरोधक त्यावरून नेतेंना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम मतांवर होऊ शकतो.लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी पाच उमेदवार असले तरी खरी लढत भाजपचे उमेदवार तथा विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव उसेंडी यांच्यातच आहे. गेल्या निवडणुकीत हेच दोन प्रतिस्पर्धी आमने-सामने होते. त्यावेळी भाजपची एकजूट, मोदी लाट, नेतेंबद्दलची सहानुभूती अशा अनेक गोष्टींमुळे नेतेंचा विजय सुकर झाला होता. पण यावेळी अनेक आव्हानांना तोंड देत विजय खेचून आणणे नेते यांच्यासाठी मोठे आव्हान झाले आहे. पक्षांतर्गत विरोधकांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नेते यांनी उसेंडी यांचा पराभव केला होता. त्यावेळचे वातावरण आणि अनेक मुद्दे त्यांच्या पथ्यावर पडणारे होते. पहिल्यांदा २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविल्यानंतर तत्कालीन काँग्रेस उमेदवार मारोतराव कोवासे यांच्याकडून नेतेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती होती. लोकसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या बहुतांश जागा भाजपच्या ताब्यात नसल्या तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांमधील एकजुटता ही भाजपची त्यावेळी ताकद होती. त्यातच देशभरात पसरलेल्या मोदी लाटेने त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक प्रशस्त केला होता. परंतु यावेळी वातावरण मागच्या निवडणुकीप्रमाणे सकारात्मक राहिलेले नाही. प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा पक्षांतर्गत विरोधकांची टीम नेते यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.गेल्या ५ वर्षात या मतदार संघाला प्रगतीच्या वाटेवरील मोठा पल्ला गाठण्यात अपेक्षेएवढे यश आलेले नाही. मोदी लाटेचा प्रभाव यावेळी ओसरल्यात जमा आहे. त्याहीपेक्षा लोकसभा मतदार संघातील भाजपच्या ५ आमदारांपैकी किती आमदार त्यांच्यासाठी तनमनाने काम करतील याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.लोकसभेसाठी नेते यांचा पत्ता कट करून आपली वर्णी लागावी यासाठी गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी प्रयत्नशील होते. त्यांना दुसऱ्या एका आमदाराचीही साथ होती. पण भाजपने नेतेंवर विश्वास टाकल्याने त्यांचा नाईलाज झाला. असे असले तरी ते आमदार एकदिलाने नेतेंसाठी कामी लागतील का? असा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. एकंदरीतच यावेळच्या लढाईत सामना अतितटीचा होणार आहे. पुढच्या १०-१२ दिवसात वातावरण आपल्या बाजूने करण्यात कोण यशस्वी होतो यावरच विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेBJPभाजपा