शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वर्षाच्या शेवटच्या दिवशी बँकांमध्ये उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. गडचिरोली शहरातील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देनिवडकच कामांवर भर : सोशल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊन झाल्यापासून बँकांमधील गर्दी ओसरली होती. मात्र ३१ मार्च आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँकेचे विविध व्यवहार करण्यासाठी गडचिरोली शहरातील बँकांमध्ये गर्दी उसळली होती.कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी बँकांसाठी रिझर्व बँकेने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये ग्राहकांना बँकेमध्ये प्रवेश देतेवेळी सोशल डिस्टन्स ठेवावे. त्यासाठी संपूर्ण ग्राहकांना बँकेत जाऊ न देता दोन ते तीनच ग्राहकांना एकावेळी बँकेत जाऊ दिले जात आहे. ग्राहकांची बाहेरच रांग लागत असल्याने अनेकांनी बँकेत जाणे बंद केले होते.एटीएमच्या माध्यमातूनच पैसे काढले जात होते. त्यामुळे लॉकडाऊन केल्यापासून बँकांमध्ये फारशी गर्दी दिसून येत नव्हती. मात्र ३१ मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पैसे भरण्यासाठी व बँकेची विविध कामे करण्यासाठी ग्राहकांची बँकेत गर्दी उसळली होती. गडचिरोली शहरातील सर्वच बँकांमध्ये ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सद्य:स्थितीत बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.गडचिरोली शहरातील बँक आॅफ इंडिया शाखेला लोकप्रतिनिधीने भेट दिली असता, बँकेच्या बाहेर उभे असलेले ग्राहक सोशल डिस्टन्सचा पालन करीत नसल्याचे दिसून आले. काही निवडकच ग्राहकांनी मास्क घातला होता. बँकेच्या आतमध्ये मात्र सोशल डिस्टन्स ठेवूनच ग्राहकांची कामे केली जात होती.कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे सक्तीचे करण्यात आले होते. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार बँक इंडियामध्ये केवळ ५० टक्केच कर्मचारी उपस्थित होते.निवडक कामांमुळे कामावर मर्यादाबँकांमध्ये गर्दी उसळू नये, यासाठी बँकांनी काही निवडकच कामे करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार रोकड भरणे, काढणे, चेक क्लिअर करणे, आरटीजीएस, नेफ्ट करणे व शासनाची कामे एवढीच कामे केली जात आहेत. इतर सर्व कामे ठप्प असल्याने पूर्वीच्या तुलनेत बँकांमध्ये फारशी गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :bankबँक