शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

अतिक्रमित शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 01:37 IST

सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना शेतकºयांचे फेटाळल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश शासनाला दिले. या आदेशामुळे अतिक्रमण करून पारपंपारिकरित्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्यांच्या उरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना शेतकºयांचे फेटाळल्या वनहक्क दाव्यातील अतिक्रमीत जमिनी ताब्यात घेण्याचे आदेश शासनाला दिले. या आदेशामुळे अतिक्रमण करून पारपंपारिकरित्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने त्यांच्या उरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी कुरखेडा तालुक्यातील शेतकºयांनी शासनाकडे केली आहे.उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वन व वन्यजीव प्रेमी तसेच काही स्वयंसेवी संस्थांनी वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अंतिम सुनावणी करताना न्यायालयाने २१ फेब्रुवारी रोजी वनहक्काचे पट्टे नाकारण्यात आलेल्या सर्व शेतकºयांची अतिक्रमित शेतजमीन शासन जमा करण्यास प्रसंगी बळाचा वापर करण्याचे आदेश शासनाला दिले आहेत. त्यामुळे शेतकºयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या आदेशाने शेतकºयांवर मोठा अन्याय होणार आहे. याबाबीची दखल घेत राज्य शासनाने न्यायलयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यापूर्वी न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी व सक्षमपणे शेतकºयांची बाजू मांडत त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.एसडीओंना निवेदन देताना माजी जि. प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल, माजी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, अविनाश गेडाम, नरेंद्र तिरणकर, नगरसेवक पुंडलिक देशमुख, संतोष भट्टड, जयराम नैताम, पुरूषोत्तम तिरगम, दशरथ लाडे, फुलचंद उपराडे, सुमेरी नैताम, वासुदेव मांदाळे, गजानन जांभुडकर, धमेंद्र परीहार, श्यामसुंदर जांभुडकर, गुरूदेव सोनटक्के, मेघशाम राऊत, विवेक ठलाल, मंगलसिंग हलामी, दयाराम उसेंडी, संतोष मांदाळे, आशिष काळे व शेतकरीबांधव उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण