शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

भामरागड तालुक्यातील तलाव कोरडेच

By admin | Updated: July 29, 2014 23:48 IST

येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

भामरागड : येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. गतवर्षी भामरागडचा हा तलाव या कालावधीत १०० टक्के पूर्ण भरला होता. यावर्षी शेतीच्या कामाला सुरूवात होऊन दोन महिने लोटेले. परंतु तलाव भरलेला नाही. तलाव भरलेला नसल्याने गावातील पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. या तलावाच्या भरवशावर २०० एकर शेतीचे सिंचन होते. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावाच्या पाण्याची फारशी गरज भासली नव्हती. शेतीचे काम संपल्यानंतर तलाव तुडूंबच भरून होता. या भागात पुन्हा पीक घेतली जात नाही. जिंजगाव, मन्नेराजाराम, मलमपोडूर, येचली, कियर या गावात तलावामध्ये मोठा जलसाठा शिल्लक असल्याने गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. इतर भागाप्रमाणे या तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. यंदा तालुक्याची वाटचाल कोरड्या दुष्काळ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील आठवड्यातील चार-पाच दिवस वगळता पाऊस न झाल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहे. यंदा शेतकऱ्यांसमोरही कमी पावसामुळे बिकट परिस्थिती आहे.भामरागड तालुक्यात एकही सिंचन योजना नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पावसाच्या भरवशावर शेती करतात. अलीकडे धानाच्या व्यतिरिक्तही दुसरे पीक शेतकरी घेत आहेत. गावातील तलाव हे शेतीच्या सिंचनासाठीचे मोठे स्त्रोत आहे. मात्र यंदा तलाव पावसाअभावी रिकामे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालांतराने भामरागडला पाणी टंचाईची समस्याही जाणविण्याची शक्यता आहे. या तालुक्यातील मोठ्या नद्यांवर सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)