शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

भामरागड तालुक्यातील तलाव कोरडेच

By admin | Updated: July 29, 2014 23:48 IST

येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

भामरागड : येथील दीडशे ते दोनशे एकर जमीन सिंचनाखाली आणणारा भामरागडचा तलाव जून, जुलै महिना लोटूनही अद्याप कोरडाच आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. गतवर्षी भामरागडचा हा तलाव या कालावधीत १०० टक्के पूर्ण भरला होता. यावर्षी शेतीच्या कामाला सुरूवात होऊन दोन महिने लोटेले. परंतु तलाव भरलेला नाही. तलाव भरलेला नसल्याने गावातील पाण्याची पातळीही खालावलेलीच आहे. या तलावाच्या भरवशावर २०० एकर शेतीचे सिंचन होते. मागच्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तलावाच्या पाण्याची फारशी गरज भासली नव्हती. शेतीचे काम संपल्यानंतर तलाव तुडूंबच भरून होता. या भागात पुन्हा पीक घेतली जात नाही. जिंजगाव, मन्नेराजाराम, मलमपोडूर, येचली, कियर या गावात तलावामध्ये मोठा जलसाठा शिल्लक असल्याने गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली होती. इतर भागाप्रमाणे या तालुक्यात कमी पाऊस झालेला आहे. यंदा तालुक्याची वाटचाल कोरड्या दुष्काळ्याच्या दिशेने सुरू झाली आहे. मागील आठवड्यातील चार-पाच दिवस वगळता पाऊस न झाल्याने शेतकरीही चिंताग्रस्त आहे. यंदा शेतकऱ्यांसमोरही कमी पावसामुळे बिकट परिस्थिती आहे.भामरागड तालुक्यात एकही सिंचन योजना नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी पावसाच्या भरवशावर शेती करतात. अलीकडे धानाच्या व्यतिरिक्तही दुसरे पीक शेतकरी घेत आहेत. गावातील तलाव हे शेतीच्या सिंचनासाठीचे मोठे स्त्रोत आहे. मात्र यंदा तलाव पावसाअभावी रिकामे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कालांतराने भामरागडला पाणी टंचाईची समस्याही जाणविण्याची शक्यता आहे. या तालुक्यातील मोठ्या नद्यांवर सिंचन योजना कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)