शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

१४८ शाळांमध्ये शौचालयांचा अभाव

By admin | Updated: February 16, 2017 01:48 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या १२ तालुक्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मिळून

गोदरीमुक्तीचा फज्जा : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांची वानवाच गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्याच्या १२ तालुक्यात प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक मिळून एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यापैकी जवळपास १ हजार ४०० शाळांमध्ये मुला/मुलींसाठी शौचालयाची व्यवस्था आहे. तर तब्बल १४८ शाळांमध्ये अद्यापही शौचालयांचा अभाव आहे. परिणामी ग्रामीण व दुर्गम भागात गोदरीमुक्तीचा फज्जा उडाला आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत १२ तालुक्यात एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यामध्ये ७० हजार ३०० विद्यार्थी आजघडीस शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये ४ हजार ४४४ शिक्षक अध्यापनासाठी कार्यरत असून १९५ मुख्याध्यापक शाळेचा प्रशासकीय कामकाज सांभाळत आहेत. १ हजार ५५० शाळांपैकी १ हजार ४८१ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालयाची व्यवस्था आहे. तर ६९ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालयाची व्यवस्थाच नसल्याने मुलींची अडचण होत आहे. मुलांसाठी एकूण १ हजार ४७१ शाळांमध्ये शौचालय असून ७९ शाळांमध्ये शौचालय नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे. आरमोरी तालुक्यात ५ शाळांमध्ये शौचालय नाही. कुरखेडा तालुक्यातील १०, गडचिरोली तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १९, चामोर्शी तालुक्यातील १८, अहेरी तालुक्यातील २०, एटापल्ली तालुक्यातील १९, सिरोंचा तालुक्यातील १६, मुलचेरा तालुक्यातील ९, कोरची तालुक्यातील १२, भामरागड तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था नाही. परिणामी या शाळांमध्ये विद्यार्थी शाळेच्या वेळेत उघड्यावरच शौचास जात असल्याचे चित्र आहे. विद्यमान केंद्र व राज्य शासनाने शौचालय उभारणीचा जम्बो कार्यक्रम हाती घेऊन गोदरीमुक्तीचा संदेश दिला आहे. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागात वैयक्तिक शौचालय मोठ्या संख्येने मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी काही शौचालय पूर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यास जवळपास ३४ हजार शौचालय बांधकामचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी १३ हजार शौचालयाचे बांधकाम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. मात्र जिल्हा परिषद व इतर शाळांमध्ये शौचालय उभारणीच्या कामाकडे शासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांकडून सातत्याने मागणी होऊनही शाळा परिसरात शौचालय बांधण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची पंचाईत होत आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने जि. प. शाळांच्या भौतिक सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)